या निवडणुकीत सर्वांत मोठी मोहीम ठरली ती भाजपची ’मैं भी चौकीदार’ मोहीम. राहुल गांधी आणि काँग्रेसच्या ’चौकीदार चोर है’ मोहिमेला प्रत्युत्तर म्हणून ही मोहीम देशभरातल्या लाखों
भाजप कार्यकर्त्यांनी आणि मोदी समर्थकांनी राबविली.
आज निवडणुकीचा निकाल स्पष्ट होताच पंतप्रधान मोदी
यांनी एक ट्वीट केलं, “आता चौकीदार मोहिमेला एक पाऊल पुढे नेण्याची वेळ आहे.
याच भावनेने भारताच्या प्रगतीच्या काम करत राहा.
“माझ्या ट्विटरवरून चौकीदार हा शब्द मी काढतोय, पण तो आता माझा अविभाज्य भाग
आहे. तुमचाही तो असावा, हा प्रयत्न करा,” असं ते या ट्वीटमध्ये म्हणाले.
"देशाच्या जनतेने चौकीदार बनून देशाची महान सेवा केली आहे. चौकीदार आता जातीवाद, भ्रष्टाचार आणि
नेते-व्यापाऱ्यांमधल्या हितसंबंधांपासून देशाला वाचवणारं एक
शक्तिशाली प्रतीक बनलं आहे."