भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 52,952 वर, 1783 जणांचा मृत्यू
देशातील कोरोना व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तींची संख्या 52,952 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 1783 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.
आतापर्यंत देशात 15,266 जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सध्या 35,905 जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत.