मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वेगवेगळ्या राजकीय
पक्षांच्या नेत्यांची आज व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली.
या बैठकीला अजित पवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, विनय कोरे, महादेव जानकर, जयंत
पाटील, राज ठाकरे, इम्तियाज जलील, अशोक ढवळे, कपिल पाटील, राजेंद्र गवई आदी नेते उपस्थित होते.
या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे
-
1.मुंबईची अशी परिस्थिती यापूर्वी पाहिली
नव्हती, जुन्या सिनेमात पाहिलं होतं.
2.कन्टेंन्मेंट झोनमध्ये पोलीस फोर्स
वाढवा.
3.परप्रांतीय जेव्हा महाराष्ट्रात परत
येतील तेव्हा त्यांची तपासणी करा.
4.सरकारचा लॉकडाऊनचा एक्झिट प्लॅन काय आहे?
5.कोरोनामुळे जी परिस्थिती उद्भवली आहे, त्याचं उत्तर ना तुमच्याकडे, माझ्याकडे, राज्य किंवा केंद्र सरकारकडे, कोणाकडेच
नाही,जग चाचपडतंय,आता टीका करुन मोरल डाऊन करु नये.
6.मी जुन्या भाषणांत सांगितलं होतं,अडचण आली की हे परप्रांतीय सर्वांत आधी
जातील, आता तेच घडतंय.
7.पोलिसांच्या जागी SRPFलावणं याचा अर्थ पोलीस कमी पडले असं
नाही,दीड महिना काम करुन त्यांच्यावर ताण
आहे, तो कमी होईल.
8.परप्रांतियांची एण्ट्री आणि एक्झिटवर
बंधनं हवीत, प्रत्येक ठिकाणी माणुसकी चालत नाही.
9.सरकारी कर्मचारी, पोलीस ते सफाई कामगार, सर्वांच्या सुरक्षेबाबत सूचना, लॉकडाऊनचा एक्झिट प्लान काय? विषयी प्रश्न विचारला.
10.गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवावी, छोटे दवाखाने सुरु करावेत, परप्रांतीय
मजूर जे बाहेर गेले आहेत,
त्यांची तपासणी करुन, नोंदणी करुन महाराष्ट्रात घ्यावं, MPSC विद्यार्थ्यांना घरी पोहोचवावं, या
सूचना केल्या.