महाडमध्ये भरत गोगावले विजयी

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले आहेत. राज्यात महायुतीकडे सत्ता येईल असे दिसत आहे.
ओंकार करंबेळकर



फोटो स्रोत, Getty Images
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त केली.
"मुख्यमंत्रीपद कोणत्याही निकषावर अवलंबून नाही. तिन्ही पक्षांचे राष्ट्रीय नेते एकत्र येतील आणि निर्णय घेतील त्याबद्दल कोणताही वाद नाही. निवडणुकानंतर तिन्ही पक्ष एकत्र निर्णय घेतील असं अमित शाह यांनी स्पष्ट केलं होतं. जो निर्णय घेतला जाईल तो सर्वांना मान्य असेल."
“आज महाराष्ट्राने आम्हाला जो विजय दिला आहे. त्यावरून महाराष्ट्राची जनता मोदीजींच्या पाठीशी आहे हे स्पष्ट दिसतं. त्यांनी एक है तो सेफ है असा नारा दिला होता. आम्ही लाडक्या बहिणींचे खूप खूप आभारी आहोत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी जो फेक नॅरेटिव्ह तयार केला होता तो संपवला गेला आहे. महाराष्ट्रात संतांची परंपरा आहे. महाराष्ट्रातील साधू संताचेंही आभार मानतो.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, रामदास आठवले आणि इतर छोट्या पक्षांचे नेते आम्ही एकत्र राहिलो.
आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो, मात्र आमच्यात ऊर्जा चेतवण्यासाठी अमित शाह यांचेही आभार मानतो.. त्याचबरोबर राजनाथ सिंह, नितीन गडकरी, अश्विनी वैष्णव, या सर्वांचे मी आभार मानतो. या विजयात माझा अतिशय कमी सहभाग आहे. ”
लातूर येथे धक्कादायक निकाल लागल्याचं पाहायला मिळत आहे. देशमुखांच्या बुरुजाला सुरुंग लागल्याचं दिसत आहे.
लातूर ग्रामीणमधून काँग्रेसचे धीरज देशमुख यांचा पराभव झाल्याची माहिती समोर येत आहे. भाजपचे रमेश कराड यांचा येथून विजय झाला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा आणखी बाकी आहे.
तर मोठे बंधू अमित देशमुख विरुद्ध भाजपच्या अर्चना पाटील चाकूरकर यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे. सध्या अमित देशमुख 800 मतांनी आघाडीवर असून आणखी 8 फेऱ्या शिल्लक आहेत.


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती 220 जागांवर आघाडीवर आहे. आतापर्यंतचे कल पाहता, महायुतीचं सरकार येईल अशी शक्यता दिसत आहे. त्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी लोकांचे आभार मानले.

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणाले, “मी महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आभार मानतो कारण हा विजय ऐतिहासिक आहे. महायुतीला बहुमत मिळेल असं मी म्हटलं होतं. मी माझ्या लाडक्या बहिणींना, लाडक्या शेतकऱ्यांना आणि सर्व वर्गातील लोकांचे आभार मानतो.”
“महायुतीने जे काम केलं आहे, त्यावर लोकांनी मत दिलं आहे. म्हणून महायुतीला इतका मोठा विजय मिळाला आहे.” मुख्यमंत्री कोण होईल या प्रश्नावर ते म्हणाले, “आधी अंतिम आकडेवारी येऊ द्या, त्यानंतर तिन्ही पक्षाचे लोक एकत्र बसतील. ज्या पद्धतीने आम्ही एकत्र निवडणुका लढवल्या, त्याचप्रमाणे एकत्र बसून निर्णय घेऊ.”

जालन्यात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अर्जुन खोतकर विजयी झालेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामगिरीवर लोकांनी शिक्कामोर्तब केलंय अशी प्रतिक्रिया निवडणुकीत विजयी झाल्यानंतर अर्जुन खोतकर यांनी दिलीय.
एकनाथ शिंदे यांचं नाणं खणखणीत चाललेलं आहे, असं सांगत खोतकर यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी आमची इच्छा आहे असल्याचं मतं खोतकर यांनी व्यक्त केलंय. सर्वोत्तम कामगिरी करण्याची संधी, मला मतदार बंधूंनी दिली असून सर्व घटकासाठी मी काम करणार असल्याचं खोतकर म्हणालेत.


झारखंड आणि महाराष्ट्र या राज्यांबरोबर देशभरात 14 राज्यातील 48 विधानसभा आणि दोन राज्यांच्या लोकसभा जागेवरही झालेल्या पोटनिवडणुकांचे निकालही आज येत आहे.

तासगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित आर आर पाटील विजयी झाले आहेत.
स्वर्गीय आर.आर. आबा पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटलांनी विजय मिळवला आहे. त्यांनी 28 हजारांच्या मताधिक्याने विजय नोंदवला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार व माजी खासदार संजय काका पाटील यांचा रोहित पाटलांनी पराभव केला आहे.

'विदर्भातून नानागिरी, कटोलमधून काकागिरी आणि सावनेरमधून गुंडगिरी आम्ही संपवली आहे. आता देवाभाऊ मुख्यमंत्री व्हावे ही इच्छा', असं मत आशिष देशमुख देशमुख यांनी व्यक्त केलं आहे.
सावनेर विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार असून सध्या त्यांची विजयाकडे घोडदौड सुरू आहे. सावनेर मधून सुनील केदार 1995 पासून आमदार आहेत पण यावेळी त्यांच्या पत्नी रिंगणात होत्या.त्यांचा पराभव आशिष देशमुख यांनी केलाय.
सिंदखेडराजा मतदारसंघात अजित पवार गटाचे देवानंद कायंदे 4292 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांना पराभूत केले आहे.

फोटो स्रोत, facebook
संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज (23 नोव्हेंबर) जाहीर होत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 20 नोव्हेंबर मतदान पार पडलं होतं. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांसाठीची मतमोजणी सुरू झाली आहे.
एका बाजूला भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची महायुती तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांची महाविकास आघाडी असा हा सामना आहे.सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मुंबईत भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोश सुरू केला आहे.


फोटो स्रोत, facebook
5973मतांनी भाजपचे राजेश वानखडे आघाडीवर यशोमती ठाकूर पिछाडीवर आहेत.
आठव्या फेरीतील मते
शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार सत्यजित देशमुख विजयी झाले आहेत. 22,624 मताधिक्यांनी मिळवला पहिल्यांदा विजय मिळाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक यांचा पराभव केला आहे.