समृद्धी महामार्ग बस अपघात : 25 जणांचा होरपळून मृत्यू, वाचलेल्या प्रवाशांनी काय सांगितलं?
समृद्धी महामार्ग बस अपघात : 25 जणांचा होरपळून मृत्यू, वाचलेल्या प्रवाशांनी काय सांगितलं?
Published
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असलेल्या एका खासगी बसला आज (1 जुलै) पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाल्याची बुलडाण्याचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, अपघात घडला त्यावेळी बसमध्ये 33 प्रवासी होते. त्यामधील 25 प्रवासी झोपेतच मृत्यूमुखी पडले. इतर 8 प्रवासी अपघातातून प्राण वाचवण्यात यशस्वी ठरले.







