शेतकरी आंदोलन: त्या व्हायरल पत्राबद्दल शरद पवार काय म्हणाले?

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

शरद पवार यांनी दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना ऑगस्ट 2010मध्ये लिहिलेल्या पत्राची सध्या बरीच चर्चा सुरू आहे.

शरद पवार यांच्या पत्राचा आधार घेत भाजपने असा आरोप केला आहे की शरद पवारांनी त्यांची भूमिका बदलली आहे.

'शरद पवार हे देखील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या विरोधात होते पण आता त्यांनी भूमिका भूमिका बदलली,' असा आरोप त्यांच्यावर केला जात आहे.

या पत्राबाबत आणि भाजपच्या आरोपांबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की "ज्या लोकांनी या पत्राचा हवाला दिला आहे जर त्यांनी हे पत्र नीट वाचून समजून घेतलं असतं तर इतका गोंधळ झाला नसता. APMC म्हणजेच कृषी उत्पन्न बाजार समित्या रद्द कराव्यात असं मी कुठेच म्हटलं नव्हतो तर या कायद्यात सुधारणा करण्यात यावी काही बदल करण्यात यावे जेणेकरून देशभरात कोठारे आणि कोल्ड स्टोरेज चेन उभ्या करता येतील. याहून अधिक विरोधकांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही."

दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना कृषिमंत्री या नात्यानं 11 ऑगस्ट 2010 रोजी लिहिलेल्या लिहिलेल्या पत्रात शरद पवार असं म्हणतात की, "कृषी क्षेत्राच्या वाढीसाठी, रोजगार निर्मितीसाठी आणि ग्रामीण भागाच्या आर्थिक उन्नतीसाठी कृषी क्षेत्राला उत्तमरीत्या कार्यरत असलेली बाजारपेठ आवश्यक आहे.

त्यासाठी मार्केटिंग आणि शीतगृहांसारख्या पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आवश्यक आहे. ते होण्यासाठी खाजगी क्षेत्राला सहभागी करुन घेणं अत्यावश्यक आहे. तशी धोरणं आणि व्यवस्था उभाराव्या लागतील."

या अनुषंगाने मॉडेल स्टेट APMC अॅक्ट 2003मध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे असं शरद पवार यांनी त्या पत्रात म्हटले होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)