You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदी: 'भारताच्या भूमीवर नजर असलेल्यांना धडा शिकवला गेला '
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये भारत-चीन यांच्यामधील तणावावर भाष्य केले. लडाखमध्ये भारताच्या भूमीवर नजर असलेल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आलं असं त्यांनी मन की बात कार्यक्रमात सांगितलं.
ते म्हणाले, भारताविरोधात कोणतंही पाऊल उचललेलं खपवून घेतलं जाणार नाही हे भारताच्या वीर सैनिकांनी दाखवून दिलं आहे. आमच्या वीर जवानांच्या बलिदानानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी दाखवलेले धैर्य हीच आमची ताकद आहे.
भारत मैत्रीसंबंध जोपासतो तसं भारताला जशास तसे उत्तरही देता येतं. भारतमातेच्या प्रतिष्ठेला धक्का लागू देणार नाही, हे आपल्या वीर जवानांनी दाखवून दिलं आहे.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
मोदी म्हणाले, "इतक्या संकटांच्या काळातही शेजारील देशांकडून ज्या हालचाली होत आहेत, त्याच्याशीही आपला देश लढत आहे. भारत नव्याने झेप घेईल. मला या देशाच्या लोकांवर विश्वास आहे. भारतानं ज्याप्रकारे संकटकाळात जगाला मदत केली आहे, त्यामुळे भारताची भूमिका सर्वांना मान्य आहे. ''
मोदी म्हणाले, लडाखमध्ये आपल्या ज्या वीर जवानांना हौतात्म्य आले आहे, त्यांच्या शौर्यासमोर संपूर्ण देशभरातले लोक नतमस्तक झाले आहेत. श्रद्धांजली वाहात आहेत. सर्व देश त्यांच्याप्रती कृतज्ञ आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रमाणे सर्व भारतीयांना त्यांच्या जाण्याने दुःख झाले आहे. आपल्या वीर जवानांच्या बलिदानाप्रती त्यांच्या कुटुंबीयांमध्ये जसा गर्व आहे तीच भावना देशामध्ये आहे. हीच तर देशाची ताकद आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्ष ताबारेषेवर चिनी सैन्याशी झालेल्या झटापटीत 20 जवानांचा मृत्यू होण्याबद्दल सांगितले, ज्यांच्या मुलांना हौतात्म्य आले ते आई-वडील आपल्या दुसऱ्या मुलांना, घरातल्या इतर मुलांना सैन्यात पाठवण्याची भाषा करत आहेत.
बिहारमध्ये राहाणऱ्या आणि या झटापटीत हौतात्म्य आलेल्या कुंदन कुमार यांच्या वडिलांचे शब्द अजूनही कानात आहेत. ते म्हणाले, आपल्या नातवालाही देशाच्या रक्षणासाठी सैन्यात पाठवू. हेच धैर्य प्रत्येक हुतात्मा जवानांच्या परिवारानं दाखवलं आहे. या कुटुंबांनी केलेला त्याग पूजनीय आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)