You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदींच्या भाषणातील 9 महत्त्वाचे मुद्दे, '5 एप्रिलला 9 वाजता 9 मिनिटं विजेचे दिवे बंद करा, पणत्या लावा'
येत्या रविवारी म्हणजे 5 एप्रिलला रात्री 9 वाजता 9 मिनिटं घरातील सर्व वीज बंद करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. त्यांनी देशातील नागरिकांना उद्देशून छोटेखानी भाषण केलं.
जगभरात दहशत पसरवणाऱ्या कोरोना व्हायरसनं भारतातल्या बहुतांश राज्यात पाय पसरलेत. कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी सर्व राज्यांच्या सरकारांसह केंद्र सरकारनंही मोठी पावलं उचलली आहे. 24 मार्चपासून 21 दिवसांसाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे.
गुरुवारी ट्वीट करुन नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की, "उद्या सकाळी 9 वाजता देशवासियांना एका व्हीडिओच्या माध्यमातून संदेश देईन." त्याप्रमाणे, मोदींनी आज सकाळी 9 वाजता पुन्हा एकदा देशवासियांशी संवाद साधला.
पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :
- अंधःकारमय संकटाला पराभूत करण्यासाठी आपल्याला प्रकाशाचं तेज चारही दिशांना पसरवलं पाहिजे.
- घंटी वाजवून, थाळ्या वाजवून लोकांनी दाखवून दिलं की, कोरोना व्हायरसविरोधात देश एक होऊन लढू शकतो.
- आपण लॉकडाऊनदरम्यान घरात नक्कीच आहोत, मात्र आपल्यातला कुणीच एकटा नाहीय. प्रत्येकजण एकमेकांसोबत आहे.
- कोरोनामुळं निर्माण झालेल्या संकटातून गरिबांना पुढे घेऊन जायचंय, प्रकाशाकडे त्यांना न्यायचंय.
- येत्या रविवारी म्हणजेच 5 एप्रिलला कोरोनाच्या संकटाला आव्हान द्यायचंय. या 5 एप्रिलला महाशक्तीचं जागरण करायचंय. त्यासाठी रात्री 9 वाजता 9 मिनिट घरातल्या सर्व वीज बंद करा आणि घराच्या दारात किंवा बाल्कनीत उभं राहून मेणबत्ती किंवा मोबाईलची लाईट लावा. आपण एकजुटीनं लढतोय, हे त्यातून दिसेल.
- वाचा - कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा -कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसची लक्षणं दिसायला किती दिवस लागतात?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा -मास्कची विल्हेवाट कशी लावायची? नवं संकट टाळण्यासाठी ‘हे’ नक्की करा
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
- आपण एकटे नाही, कुणीच एकटा नाहीय, हा संकल्प आपल्याला करायचाय.
- कुणीही कुठेही एकत्र जमा व्हायचं नाही. तुमच्या घराच्या बाल्कनीतूनच हे करायचंय.
- सोशल डिस्टन्सिंगच्या लक्ष्मणरेषेला कधीच पार करायचं नाही. कोरोनाला पराभूत करण्याचा हाच रामबाण उपाय आहे.
- 5 एप्रिलच्या रात्री 9 वाजता भारतमातेची आठवण काढा आणि 130 कोटी जनतेच्या ताकदीचा अनुभव घ्या.
दरम्यान, 24 मार्च रोजी ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला उद्देशून भाषण केलं होतं, त्यावेळी पुढचे 21 दिवस (म्हणजे 14 एप्रिलपर्यंत) देशात लॉकडाऊनची घोषणा केली होती. अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तू, सेवांशिवाय इतर सर्व गोष्टी बंद करण्याचं आवाहान त्यांनी केलं होतं. मात्र, तरीही देशभरात अनेक ठिकाणी लोकांची गर्दी दिसून आली. विशेषत: मजूर, कामगारवर्ग शहरांमधून गावाकडे पायी जाताना दिसला.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)