You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Lokmanya Tilak Express: मुंबईहून निघालेल्या रेल्वेचे 8 डबे घसरले, 20 जण जखमी
मुंबईहून भुवनेश्वरकडे निघालेल्या लोकमान्य टिळक एक्सप्रेसचे 8 डबे रेल्वे रुळावरून घसरले. या घटनेत किमान 20 जण जखमी झाल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
सकाळी सातच्या सुमारास ओडिशातील कटकजवळ सालनगाव आणि नेरगुंडी स्टेशनच्यामध्ये ही घटना घडली.
जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
या घटनेनंतर पाच रेल्वेंचं वेळापत्रक आणि मार्ग बदलण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
( ही बातमी सातत्याने अपडेट होत आहे. )
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)