बिहारमध्ये जंगलराज संपून मंगलराज सुरू होईल - संजय राऊत
बिहार निवडणुकीचे निकाल अजून यायचे आहेत. पण जे कल येतायेत, त्यावरून एक तरुण नेत्ता केंद्रतल्या सत्तेला सुद्धा काँटे की टक्कर देत आहे. तेजस्वी पर्व सुरू होतय अस चित्र आहे. तेजस्वी समोर पूर्ण मंत्रिमंडळ होतं, पण या मुलानं ज्या पद्धतीने टक्कर दिलीय, भविष्यसाठी एक मोठं संकेत आहे. बिहारमध्ये जंगलराज संपून मंगलराज सुरू होईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
बिहार च निकाल काही लागू द्या, पण ज्या प्रकारे जनतेने साहस दखवलय त्याचा परिणाम देशाच्या राजकारणावर होणार. महाराष्ट्रात परिवर्तन झालं त्यानंतर देशात संकेत गेला परिवर्तन शक्य आहे.
नितीश कुमार यांच्या भाषणात विकासाचा मुद्दा पाहिजे होता. नोकरीचा मुदा पाहिजे होता. मात्र हे मुद्दे कधीच दिसले नाहीत. त्यामुळे बिहारमध्ये लोकांना बदल हवा होता. तो आता दिसतोय, असं संजय राऊत म्हणाले.