कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे.
-ईद घरातूनच साजरी
करा. मुस्लिम बांधवाकडूनही सहकार्य मिळतंय.
-कोरोना विषाणू
गुणाकार करत जातो. अर्थसंकल्प जाहीर झाला, प्रत्येक भागासाठी काही करणार तोच हे
संकट आलं.
-मे महिन्याच्या
शेवटच्या टप्प्यात राज्यात सव्वा ते दीड लाख पॉझिटिव्ह केसेस असतील असा
केंद्रीय पथकाचा अंदाज होता. खबरदारी म्हणून त्यांनी सांगितलं होतं. आता 33,786
पॉझिटिव्ह केसेस आहेत. 13,404 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. सव्वा लाख रुग्ण होतील
असं भाकीत होतं, पण 33 हजार अक्टिव्ह केसेस आहेत.
-मला हुकूमशहा
झाल्यासारखं वाटतंय. घर के बाहेर निकल के देख, दिखाता हूँ असं वाटतं. बाहेर धोका
आहे, म्हणून आपल्याला घरी राहायचं आहे.
-बीबीसीने
दिलेल्या वृत्तानुसार, कोरोना पॉझिटिव्ह आईंच्या पोटी जन्माला आलेली बालकं
ठणठणीत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर. त्या डॉक्टरांचं, हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचं कौतुक आहे.
-पुढची लढाई बिकट
आहे. जीवघेणा. घाबरण्याचं कारण नाही. आरोग्य सुविधा निर्माण करतो आहोत. फिल्ड
हॉस्पिटल्स उभारण्यात आली आहेत. आयसीयू बेड्स उभे
करतो आहेत. रुग्णांची आबाळ होतेय अशा बातम्या येत आहेत. व्हायला नको, पण त्रास
होतो. कारण हे संकट अभूतपूर्व आहे. कोणाच्याही आकलनाच्या पलीकडे आहे.
-मे महिन्याच्या अखेरीस 14
हजार बेड्स हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून देऊ शकू. लक्षणं नसलेले, व्हेंटिलेटरची गरज
असलेले अशी रुग्णांची विभागणी
-राज्याला रक्ताची
आवश्यकता. ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर रक्तदान करावं.
-पावसाळा येतो आहे. साथीच्या रोगांकडे दुर्लक्ष करू नका.
ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, तोंडाची चव जाणं, थकवा यांच्याकडे दुर्लक्ष करू नका.
लक्षणं दिसत असतील तर
-पॅकेजच्या घोषणा आधीही झालेल्या आहेत. पॅकेज येतं, आत पोकळ असतं. आधी हे संकट दूर करणं आवश्यक