भारतात कोरोनाचा रिकव्हरी रेट 25.19 टक्के - आरोग्य मंत्रालय
भारताच्या आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत देशातील कोरोना व्हायरस संदर्भात माहिती दिली.
त्यांनी मांडलेले मुद्दे –
1.मजूर, विद्यार्थी, पर्यटक यांच्या स्थलांतराविषयी परवानगी देण्यात आली आहे. या प्रवाशांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात येईल. प्रवास करताना सोशल डिस्टन्सिंग पाळावे लागेल. प्रवाशांची तपासणी करण्यात येईल.
2.देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1718 नवीन रुग्ण आढळले असून एकूण रुग्णांची संख्या 33 हजार 50 झाली आहे.
3.गेल्या 24 तासांत 67 मृत्यूंची नोंद झाली. आतापर्यंत देशात 1074 जणांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.
4.देशातील कोरोनाचा रिकव्हरी रेट 25.19 टक्के झाला आहे, आधी तो 13.06 टक्के होता.
5.लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर देशातील कोरोनाचा डबलिंग रेट जास्त होता, आता तो कमी झाला आहे. अनेक राज्यांमध्ये ही स्थिती दिसून आली.