शेतकऱ्यांसाठी राज्याच्या कृषिमंत्र्यांचे महत्त्वाचे आदेश :
लॉकडाऊनमधून शेतीची कामे वगळल्यानंतर महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी खालील आदेश दिले आहेत :
- राज्यात 140 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप 2020 चे नियोजन सुरू करण्यासाठी आवश्यक बियाणे उपलब्ध करुन द्या.जिल्हा, विभागीय स्तरावरील नियोजन 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करा.
- खरीप नियोजनात शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी आवश्यक सर्व उपाययोजनांचा समावेश करा. जिल्ह्याच्या नियोजनानंतर पालकमंत्र्यांची मान्यता घ्या. त्यानंतर विभाग, राज्यस्तरीय नियोजन पूर्ण करा. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेसाठी नियोजन सादर करणार
- राज्यात 140 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप 2020 चे नियोजन. त्यात प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, बाजरी या पिकांचा समावेश. सुमारे 16.57 लाख क्विंटल बियाण्यांची आवश्यकता. केंद्र शासनाकडून 40 लाख मेट्रिक टन खत पुरवठा केला जाणार
- कृषी विभागाच्या महत्वाकांक्षी योजनांची यशस्वी अमंलबजावणी होणे आवश्यक. शेततळे अस्तरीकरण, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, ठिबक सिंचन या योजनांची नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करा

फोटो स्रोत, Twitter/@MahaDGIPR




