लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढणार?
कोरोना व्हायरसच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन 15 दिवस वाढवण्यात यावा, अशी मागणी देशातील बहुसंख्य राज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
सरकार याबाबत विचार करत आहे, अशी बातमी एएनआय वृत्त संस्थेने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक ट्वीट करून मोदींनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय योग्य असल्याचं सांगितलं आहे.
"भारताची परिस्थिती इतर प्रगत देशांपेक्षा नक्कीच चांगली आहे. जर आता हे लॉकडाऊन संपवलं, तर आतापर्यंत जेही कमावलंय, त्यावर पाणी फेरलं जाईल. त्यामुळे लॉकडाऊन वाढवणंच महत्त्वाचं आहे," असंही केजरीवाल म्हणाले.