पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला सचिन तेंडूलकर, पी. व्ही. सिंधूसह 40 खेळाडूंशी संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील 40 खेळाडूंशी संवाद साधला. कोरोना व्हायरसमुळे देशात तयार झालेल्या परिस्थितीवर त्यांनी चर्चा केली.
You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाहा कोरोना व्हायरस विषयीचे देश जगातले सर्व ताजे अपडेट्स एकाच ठिकाणी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील 40 खेळाडूंशी संवाद साधला. कोरोना व्हायरसमुळे देशात तयार झालेल्या परिस्थितीवर त्यांनी चर्चा केली.
दिल्लीमध्ये सॅनिटायजेशनसाठी ड्रोनचा वापर करण्यात येत आहे.
कोरोना विषाणुविषयीची अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी जगभरात संशोधनं आणि अभ्यास सुरू आहे. लंडनमधल्या किंग्ज कॉलेजनेही एक अभ्यास केला.
या अभ्यासाच्या निष्कर्षानुसार गंध न येणं आणि पदार्थाची चव न कळणं ही देखील कोव्हिड-19 आजाराची लक्षणं असू शकतात. याबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
कोरोना व्हायरसचा सर्वात मोठा धक्का युरोपातील इटलीला बसला आहे. इथे रुग्णावर उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. इटलीची स्ध्याची स्थिती पाहाण्यासाठी हा व्हीडिओ पाहा
अचानक लॉकडाऊनची घोषणा केल्यामुळे या हातावर पोट असणाऱ्या कामगारांची अवस्था अत्यंत वाईट झाली. लॉकडाऊनमुळे या लोकांची परवड कशी झाली ? पाहा व्हीडिओ
जगातील कोरोना व्हायरसची लागण झालेल्या लोकांची संख्या 10 लाखांच्यावर गेली आहे. आतापर्यंत 52 हजार लोकांचे प्राण कोरोना व्हायरसमुळे गेले आहेत. जगातील बहुतांश देशांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार झाला आहे. इटली, अमेरिका, इंग्लंड या देशांमध्ये कोरोनाचा प्रसार वेगाने होत असल्याचे दिसून आले आहे.
राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 5 एप्रिल रोजी दिवे लावण्याच्या आवाहनावर टीका केली आहे. आपल्या देशाला रुग्णालये आणि व्हेंटिलेटरची गरज असल्याचे त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून सांगितले आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीची ओळख आहे. या झोपडपट्टीत कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्यानं चिंता व्यक्त केली जातेय. कारण स्वच्छता आणि गर्दीचा सर्वात मोठा प्रश्न या परिसरात कायमच दिसून आलाय.
धारावीत आज कोव्हिड-19 चा तिसरा रुग्ण सापडला आहे.- धारावी आणि कोरोनाबद्दल माहिती वाचण्यासाठी 'येथे' क्लिक करा.
कोरोना व्हायरसच्या देशातील प्रसाराबाबत चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आलेल्या या बैठकीत गृहमंत्री अमित शाह उपस्थित आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातल्या स्थितीबद्दल 40 खेळाडूंबरोबर व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करत आहेत.
लोकांची चूल कशी पेटेल असं साहेब बोलतील वाटलं मात्र वाटलं होतं लोकांची चूल पेटवण्यासंदर्भात बोलतील परंतु साहेब दिवा पेटवण्याचा संदेश देवून गेले अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. आज सकाळी 9 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 9 वाजता देशवासियांना संबोधित केले मात्र या भाषणातून देशवासियांच्या पदरात पुन्हा एकदा निराशा पडली आहे असेही नवाब मलिक म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या तबलीगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन आधी दिल्लीऐवजी मुंबईजवळच्या वसईमध्ये होणार होतं. पण कोरोना विषाणूचा धोका पाहता पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली, असं महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.
वसईत 14 आणि 15 मार्च रोजी हा कार्यक्रम होणार होता आणि तिथे सुमारे 50 हजार भाविक उपस्थित राहणार होते. शमीम एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीनं गृहविभागाला रीतसर पत्र देऊन या कार्यक्रमासाठी परवानगी मागितकली होती.
पोलीसांनी 5 फेब्रुवारीला पत्राद्वारे या कार्यक्रमास परवानगी देत असल्याचं सोसायटीला कळवलं होतं. पण देशात कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून आले आणि अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले. अशा परिस्थितीत 50 हजार नागरीक एकत्र येणं धोकादायक ठरू शकलं असतं. त्यामुळं 6 मार्च रोजी या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली.
“राज्यात गृह विभागाने तत्परता दाखवून संभाव्य परिस्थिती टाळली, तशीच दिल्ली येथेही वेळीच सतर्कता बाळगून परिस्थिती टाळता आली असती”, असं अनिल देशमुख म्हणाले आहेत.
तबलीगी जमातच्या मरकजमध्ये आलेले भाविक आपापल्या घरी गेल्यानं स्थानिक पातळीवर काहींना कोरोना विषाणूची लागण झाली असल्याचं समोर आलं होतं. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन केलं जात आहे.
दिल्लीच्या निजामुद्दीन भागात 15 ते 17 मार्च दरम्यान एक कार्यक्रम झाला. त्यात अनेक लोक सहभागी झाले होते. देशात कोरोनाच्या केसेस वाढत असतानाच अनेक लोकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.
डॉ. हर्षवर्धन यांनी डॉ. राममनोहर लोहिया रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य व्यवस्था व उपचारांचा आढावा घेतला.
कोरोना व्हायरसची लागण झालेल्या लोकांची संख्या 2301 वर गेली आहे. त्यातील 56 जणांचा मृत्यू झाला आहे. 156 लोक बरे झाले आहेत.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशातल्या विविध राज्यांचे राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेशांच्या नायब राज्यपालांशी संवाद साधला
राजस्थानातील भिलवाडा येथील कोरोनाची लागण झालेल्या 26 रुग्णांपैकी 17 रुग्ण बरे झाले आहेत. राजस्थानात एकूण रुग्णांची संख्या 154 असून त्यात दोन इटलीचे नागरिक आहेत.