राज ठाकरेंच्या मनसेचं इंजिन स्वत: धावणार की इतरांना धडक देणार?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मुख्य लढत भाजपप्रणित महायुती आणि काँग्रेसप्रणित महाविकास आघाडी यांच्यात असली, तरी इतर पक्षांची लढतही दुर्लक्ष करता न येण्यासारखी आहे. त्यात महत्त्वाचा पक्ष म्हणजे राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना.
राज ठाकरेंनी आधीच जाहीर केल्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीत ते स्वबळावर उतरले आहेत. मनसेनं राज्यातील 288 पैकी 125 मतदारसंघात आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

फोटो स्रोत, ANI
मनसेनं 288 विधानसभा मतदारसंघांपैकी 125 उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यात काही ठिकाणी उतरवले आहेत.
मुंबई आणि ठाण्यात 54 मतदारसंघ आहेत. मनसे या भागात प्रबळ मानली जाते आणि यंदा या 54 पैकी 41 जागा मनसे लढवतेय. म्हणजेच, या 41 जागी महाविकास आघाडी, महायुती आणि मनसे अशी तिरंगी लढत पाहायला मिळेल.
मनसेने मुंबईत 27 आणि ठाण्यात 14 उमेदवार दिले आहेत.
मनसेचे उमेदवार महायुती आणि महाविकास आघाडी उमेदवारांना आव्हान देणार असल्यानं मनसेमुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची गणितं बिघडू शकतात, असं राजकीय विश्लेषकांना वाटतं.
संपूर्ण माहितीसाठी क्लिक करा- मनसेमुळे ‘या’ मतदारसंघात चुरशीची लढत






















