भारताची 3 राफेल विमानं पाडल्याचा पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा दावा

भारतानं पाकिस्तान आणि पाकिस्तान प्रशासित काश्मीरवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. भारतीय सैन्यानं 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केल्याची माहिती भारत सरकारने निवेदन प्रसिद्ध करून सांगितलं.

थोडक्यात

  • भारतीय सैन्यानं 'ऑपरेशन सिंदूर' सुरू करत, पाकिस्तानवर केला क्षेपणास्त्र हल्ला
  • सीमेपलिकडून झालेल्या गोळीबारात 15 ठार : भारतीय लष्करी अधिकारी
  • भारताच्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्याची पाकिस्तानची माहिती
  • 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये एकूण 9 ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याची भारताची माहिती, तर पाकिस्तानने 6 जागांवरच हल्ला झाल्याचे केले स्पष्ट
  • पाकिस्तानने भारताची 5 लढाऊ विमानं पाडल्याचा दावा केला, मात्र भारताकडून पुष्टी नाही तसेच पाकिस्तानच्या या दाव्याची बीबीसीला स्वतंत्ररित्या शहानिशा करत नाही.
  • पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले, 'आम्हाला उत्तर देण्याचा पूर्ण अधिकार'
  • पाकिस्तानच्या गोळीबारात तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याची भारतीय सैन्याची माहिती
  • एअर इंडियासह अनेक विमानांचे मार्ग बदलले, अनेक उड्डाणं रद्द
  • पाकिस्तान आणि भारताने अनेक भागातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद केली आहेत

लाईव्ह कव्हरेज

ओंकार करंबेळकर, आशय येडगे, अमृता कदम

  1. सीमेपलिकडून झालेल्या गोळीबारात 10 ठार : भारतीय लष्करी अधिकारी

    सीमेपलिकडून भारतीय भागात झालेल्या गोळीबारातील भारतीय नागरिकांच्या मृतांचा आकडा 10 वर पोहोचला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बीबीसीला याबाबत माहिती दिली आहे. हे सर्व मृत्यू पूंछ जिल्ह्यात झाले आहेत. हा भाग भारत आणि पाकिस्तानमधील नियंत्रण रेषेजवळ (डी-फॅक्टर सीमेवर) आहे. भारतानं पाकिस्तान आणि पाक प्रशासित काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईनंतर सुरू झालेल्या हिंसाचारात किमान 32 जखमी झाल्याचं वृत्त आहे.

    सीमेपलिकडून झालेल्या गोळीबारात 10 ठार : भारतीय लष्करी अधिकारी

    फोटो स्रोत, Getty Images

    सीमेपलिकडून भारतीय भागात झालेल्या गोळीबारातील भारतीय नागरिकांच्या मृतांचा आकडा 10 वर पोहोचला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बीबीसीला याबाबत माहिती दिली आहे. हे सर्व मृत्यू पूंछ जिल्ह्यात झाले आहेत. हा भाग भारत आणि पाकिस्तानमधील नियंत्रण रेषेजवळ (डी-फॅक्टर सीमेवर) आहे. भारतानं पाकिस्तान आणि पाक प्रशासित काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईनंतर सुरू झालेल्या हिंसाचारात किमान 32 जखमी झाल्याचं वृत्त आहे.

    भारताच्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्याची पाकिस्तानची माहिती

    पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी म्हणाले की, 'दोन्ही देशांमधील प्रत्यक्ष सीमा असलेल्या नियंत्रण रेषेवर झालेल्या भारतीय हवाई हल्ल्यात आणि गोळीबारात 26 जण ठार झाले आहेत आणि 46 जण जखमी झाले आहेत.

    सीमेपलिकडून झालेल्या गोळीबारात 10 ठार : भारतीय लष्करी अधिकारी

    फोटो स्रोत, Getty Images

    पाकिस्तानने यापूर्वी मृतांची संख्या आठ असल्याचे सांगितले होते.

    आजच्या पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितलं की, "पाकिस्तानात नागरिकांच्या जीवितहानी झाल्याचे कोणतेही वृत्त नाही".

  2. ‘आम्ही तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं’, आमीर पीरजादा, श्रीनगर

    भारताच्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर (LoC) केलेल्या गोळीबारात तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

    त्यांपैकी एका मृत्यूबाबत अधिक माहिती समोर येत आहे. पूंछ जिल्ह्यातील रहिवासी असलेले बुवा सिंग यांनी सांगितलं की, त्यांची भाची रुबी कौर यांच्या घरावर रात्री उशीरा एक मॉर्टर शेल (तोफगोळा) पडला.

    "तिचा पती आजारी होता. त्याच्यासाठी चहा बनवण्यासाठी ती नुकतीच उठली होती. त्या वेळी शेलचा एक तुकडा तिच्या डोक्याला लागला, ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली. खूप रक्तस्राव झाला. आम्ही तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं," असं सिंग सांगतात.

    रुबी कौर यांची मुलगीही गंभीर जखमी झाली आहे. सिंग सांगतात की, त्या भागात कोणतीही बंकर सुविधा नाही. त्यामुळे लोकांना आपल्या घरातच आसरा घ्यावा लागतो.

    "इतका जोरदार गोळीबार आम्ही आजवर कधीच पाहिला नव्हता," असं त्यांनी म्हटलं.

  3. पाकिस्तान आणि पाकिस्तान प्रशासित काश्मीरमध्ये हल्ल्यानंतर काय परिस्थिती?

    'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान प्रशासित काश्मीरमध्ये हल्ले करण्यात आले आहेत, असं भारत सरकारने म्हटलं आहे.या हल्ल्यांनंतर गेटी, ईपीए आणि रॉयटर्स या फोटो एजन्सींनी ही छायाचित्रं प्रसिद्ध केली आहेत.या छायाचित्रांमधून कुठे आणि किती नुकसान झाले आहे, ते दिसून येतं. हे फोटो 7 मे 2025चे आहेत.

    Instagram पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    Instagram पोस्ट समाप्त

  4. इस्रायलचं भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराला समर्थन

    रुवेन अझर

    फोटो स्रोत, ANI

    इस्रायलचे भारतातील राजदूत रुवेन अझर यांनी भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'वर प्रतिक्रिया दिली आहे.

    "इस्रायल भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचे समर्थन करतो. दहशतवाद्यांना हे माहित असले पाहिजे की निष्पाप लोकांविरुद्ध केलेल्या त्यांनी केलेल्या अक्षम्य गुन्ह्यांपासून ते वाचू शकत नाहीत," असे रुवेन अझर यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटलं आहे.

    भारतीय संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, "पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले आहेत."

    भारताने या हल्ल्यांना 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव दिले आहे.

  5. "कसाब, हेडली जिथे प्रशिक्षित झाले त्या मुरीदकेसह 9 कॅम्पवर कारवाई"

    लष्कराच्या अधिकारी कर्नल सोफिया कुरैशी आणि विंग कमांडर व्योमीका सिंग यांनी भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईची माहिती दिली.

    भारतीय सैन्याने 6 आणि 7 मेच्या रात्री 1.05 मिनिटे ते 1.30 वाजेदरम्यान भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवलं.

    ऑपरेशन सिंदूर 22 एप्रिलला झालेल्या निर्घृण अशा पहलगाम हल्ल्यातील पीडित भारतीय नागरिक आणि त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी राबवण्यात आलं. या कारवाईत 9 दहशतवादी तळांना लक्ष्य करून पूर्णपणे उध्वस्त केलं.

    कर्नल सोफिया कुरैशी आणि विंग कमांडर व्योमीका सिंग

    फोटो स्रोत, ANI

    भारताने 'या' नऊ ठिकाणांवर कारवाई केली

    1.सवाई नाला कॅम्प - मुजफ्फराबाद पाकव्याप्त काश्मीरच्या नियंत्रण रेषेपासून 30 किमी दूर - लश्कर ए तोएबाचं प्रशिक्षण केंद्र - 20 ऑक्टोबर 2024 सोनमर्ग , 24 ऑक्टोबर 2024 गुलमर्ग आणि 22 एप्रिल 2025 पहलगामच्या हल्ल्यातील सहभागी दहशतवाद्यांनी इथूनच प्रशिक्षण घेतलं होतं.

    2. सय्यद ना बिलाल कॅम्प - मुजफ्फराबाद - हा जैश ए मोहम्मदचा महत्त्वाभा भाग आहे. हा शस्त्रं, स्फोटकं आणि प्रशिक्षणाचं केंद्रही होतं.

    3. गुलफूर कॅम्प - कोटली हे नियंत्रण रेषेपासून दूर असलेलं लष्कर ए तोएबाचं तळ होतं. ते राजौंरी, पुंछमध्ये सक्रिय होतं. 20 एप्रिल 2023 ला पुंछमध्ये आणि 9 जून 2024 ला तीर्थयात्रा करणाऱ्या भाविकांच्या बस हल्ल्याची दहशतवाद्यांना इथूनच प्रशिक्षित केलं होतं.

    4. बरनाला कॅम्प - भिमबर नियंत्रण रेषेपासून 9 किलोमीटर दूर आहे. इथं शस्त्रं चालवणं, आयडी आणि जंगलात कसं सर्व्हाईव्ह करावं याचं प्रशिक्षण देण्यात येत होतं.

    5. अब्बास कॅम्प - कोटली नियंत्रण रेषेपासून 13 किलोमीटर दूर आहे. लष्कर ए तोयबाचे आत्मघातकी हल्लेखोर इथं प्रशिक्षित केले जात होते. 15 दहशतवादी प्रशिक्षित करण्याची याची क्षमता होती. पाकिस्तानात असलेले लक्ष्य

    6. सरजल कॅम्प - सियालकोट आंतरराष्ट्रीय सीमेपासून 6 किलोमीटर दूर आहे. साबा कठुआच्या समोर. मार्च 2025 मध्ये जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या 4 जवानांची हत्या करण्यात आली होती. त्या दहशतवाद्यांना इथूनचं प्रशिक्षित करण्यात आलं होतं.

    7. मेहमुना जोया कॅम्प - सियालकोट आंतरराष्ट्रीय सीमेपासून 12-18 किलोमीटर दूर होतं.ते हिज्बुल मुजाहीदीनचं मोठं तळ होतं. कठुआ जम्मू भागात दहशत पसरवण्याचं नियंत्रण केंद्र होतं. पठाणकोट एअरफोर्स बेसवर करण्यात आलेल्या हल्ल्याचा कट इथंच तयार करण्यात आला होता.

    8. मरकझ तोयबा मुरीदके - आंतरराष्ट्रीय सीमेपासून 18-25 किलोमीटर दूर आहे. अजमल कसाब आणि डेव्हिड हेडलीसह 2008 मधील मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दहशवाद्यांना इथंच प्रशिक्षित करण्यात आलं होतं.

    9. मरकझ सुभानअल्लाह - भवलपूर आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किलोमीटर दूर आहे. हे जैश ए मोहम्मदचे मुख्यालय होते. इथं भरती, प्रशिक्षण केंद्रही होतं. प्रमुख दहशतवादी याठिकाणी नेहमी येत होते. कोणत्याही लष्करी तळावर हल्ला करण्यात आला नाही. तसंच आतापर्यंत कोणतीही नागरी हानी झाली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

  6. पहलगाम हल्ल्याच्या पंधरा दिवसांनंतरही पाकिस्तानने काहीच कारवाई केली नाही, म्हणून...

    भारतीय संरक्षण विभागाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री म्हणाले, "22 एप्रिलला लश्कर ए तोएबाच्या दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये निर्घृण हल्ला केली. 25 नागरिक आणि एका नेपाळी नागरिकांची हत्या केली. भारतातील नागरिकांच्या हत्येचा विचार करता मुंबईच्या 26-11 हल्ल्यानंतरची हा मोठा हल्ला होता.

    हा हल्ला अत्यंत निर्घृण अशा प्रकारचा होता. नातेवाईकांसमोर लोकांना जवळून डोक्यात गोळी घातली गेली. अशा प्रकारच्या हत्येमुळं कुटुंबातील लोकांच्या मनावर जाणून बुजून आघात करण्यात आला. तसंच त्यांना परत जाऊन हा संदेश पोहोचवण्यास सांगण्यता आलं.

    जम्मू आणि काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य होत असल्यानं हा हल्ला करण्यात आल्याचं स्पष्ट होतं. कारण याठिकाणी पुन्हा पर्यटन अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार बनत चाललं होतं. त्यामुळं त्यावर परिणाम करणं हा हल्ल्याचा मुख्य उद्देश होता."

    परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री

    फोटो स्रोत, ANI

    विक्रम मिस्त्री पुढे म्हणाले, "एका गटानं स्वतःला रेझिस्टंस फ्रंट (टीआरएफ) म्हणत या हल्ल्याची जबाबदारी घेतली. हा गट संयुक्त राष्ट्राने बंदी घातलेल्या पाकिस्तानी दहशतवादी संघटना लश्कर ए तोयबाशी संबंधित आहे. उल्लेखनीय म्हणजे भारताने मे आणि नोव्हेंबर 2024 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या 1267 कमिटीच्या सँक्शन मॉनिटरिंग टीमला सहामाही अहवाल दिला होता. त्यात टीआरएफबाबत माहिती दिली होती.

    त्यातून टीआरएफची पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांसाठीची भूमिका समोर आली होती. यापूर्वीही डिसेंबर 2023 मध्ये भारतानं या टीमला लश्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद बाबत माहिती दिली होती.

    या संघटना टीआरएफसारख्या लहान दहशतवादी संघटनांच्या माध्यमातून हालचाली करत होते. याबाबत 25 एप्रिलला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीच्या निवेदनात टीआरएफचा संदर्भ काढण्यासाठी पाकिस्ताननं आणलेल्या दबावाकडंही लक्ष वेधणं गरजेचं आहे."

    आजच्या हल्ल्याबाबत बोलताना मिस्त्री म्हणाले, "22 एप्रिलच्या हल्लेखोर आणि कट रचणाऱ्यांना न्यायाच्या चौकटीत उभं करणं गरजेचं समजलं गेलं.हल्ल्याच्या 15 दिवसांनंतरही पाकिस्ताननं त्यांच्या ताब्यातील भागात असलेल्या दहशतवाद्यांच्या तळांवर कारवाई करण्याबाबत काहीही पावलं उचललली गेली नाहीत. उलट त्यांनी नकार देऊन आरोप करणं महत्त्वाचं समजलं.

    पाकिस्तानच्या हद्दीत असलेल्या दहशतवादी गटांवर नजर असलेल्या यंत्रणेनं भारताविरोधात आगामी काळातही हल्ले होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळं त्यांना रोखणं आणि त्यांचा निपटारा करणं अत्यंत गरजेचं होतं.

    आज (7 मे) सकाळी सर्वांनी माहिती असेल त्याप्रकारे भारतानं अशा प्रकारच्या हल्ल्यांचं उत्तर देण्याच्या आणि ते रोखून त्यांचा विरोध करण्याच्या अधिकाराचा वापर केला आहे.

    ही कारवाई अत्यंत अचूक, योग्य ठिकाणी, योग्य प्रमाणात आणि जबाबदारी पूर्ण आहे. दहशतवाद्यांची तळं नष्ट करणं आणि भारतात पाठवल्या जाणाऱ्या संभाव्य दहशतवाद्यांना अक्षम बनवणं हे याचं उद्दिष्ट आहे."

  7. भारतानं पाकिस्तानात जिथं हल्ला केला, तिथली पहिली दृश्यं पाहा

    भारतीय लष्करानं 'ऑपरेशन सिंदूर' सुरू करत, पाकिस्तानातील 9 ठिकाणांना क्षेपणास्त्रांद्वारे लक्ष्य केलं आहे. भारत सरकारनं एका निवेदनाद्वारे या क्षेपणास्त्र हल्ल्याची माहिती दिली.

    भारत सरकारने आपल्या निवेदनात म्हटलंय की, "या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करण्यात आलं आहे. याच ठिकाणावरून भारतावर दहशतवादी हल्ल्यांचा कट झाला आणि त्याची अंमलबजावणी करण्यात आली."

    व्हीडिओ कॅप्शन, ऑपरेशन सिंदूर : भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर मुझफ्फराबादमधली पहिली दृश्य
  8. भारताने केलेल्या हल्ल्यांवर पाकिस्तानातल्या प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?

    पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुरिदके येथील रहिवासी मोहम्मद युनूस शहा यांनी बीबीसीला सांगितले की, भारताने डागलेली चार क्षेपणास्त्रं तिथल्या एका शैक्षणिक संकुलावर पडली.

    त्यांनी सांगितलं की, "पहिली तीन क्षेपणास्त्रं एकामागोमाग आली, तर चौथं सुमारे पाच ते सात मिनिटांच्या अंतराने आलं."

    या शैक्षणिक संकुलामध्ये शाळा, कॉलेज, वसतिगृह, मेडिकल कॉलेज तसंच एक मशीद आहे. या मालमत्तेचं काही प्रमाणात नुकसान झालं आहे.

    शहा यांनी सांगितलं की, या संकुलात निवासी वसाहतही आहे, जिथे काही कुटुंब राहतात. येथील परिसरात घबराटीचे वातावरण आहे.

    बचाव कर्मचारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी तसंच पोलिस या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना इथून सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याचंही मोहम्मद युनुस यांनी सांगितलं.

    "रहिवासी, अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी उपस्थित आहेत. या परिसरात भीती आणि घबराटीचं वातावरण आहे," ते म्हणाले. "येथील सर्व लोक आता सुरक्षित स्थळी स्थलांतरित झाले आहेत," असंही त्यांनी जोडून सांगितलं.

    पाकिस्तानी निमलष्करी दलाचे सैनिक

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, हल्ल्यानंतर मुरीदके येथील एका संकुलातील कोसळलेल्या इमारतीची पाहणी करताना पाकिस्तानी निमलष्करी दलाचे सैनिक

    मुहम्मद वहीद पाकिस्तान प्रशासित काश्मीरची राजधानी मुझफ्फराबाद येथील बिलाल मशीदजवळ राहतात.

    "मी गाढ झोपेत होतो, तेव्हा पहिला स्फोट झाला आणि माझं घर हादरलं," असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.

    "मी लगेच रस्त्यावर गेलो, तिथे आधीच लोक जमले होते. काय घडतंय हे आम्हाला समजण्याआधीच अजून तीन क्षेपणास्त्रं डागली गेली. त्यामुळे प्रचंड घबराट पसरली.”

    वहीद यांनी सांगितलं की, या हल्ल्यात डझनभर लोक जखमी झाले असून त्यात महिलांचाही समावेश आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं आहे.

    "आमच्याच मशिदीला का लक्ष्य केलं गेलं हे मला समजत नाही," असं वहीद यांनी म्हटलं. “ही एक अतिशय साधी मशीद होती, जिथे आम्ही दररोज पाच वेळा नमाज अदा करत होतो. आम्हाला तिथे कधीच काही संशयास्पद हालचाल दिसली नाही."

    भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान प्रशासित काश्मीरमधील उद्ध्वस्त बिलाल मशिदीचा फोटो

    फोटो स्रोत, Getty Images

  9. भारताचा हल्ला खेदजनक - चीन

    चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानविरुद्ध भारताच्या लष्करी कारवाईला 'खेदजनक' म्हटले आहे.

    भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितलं की, 'भारत आणि पाकिस्तान एकमेकांचे शेजारी आहेत आणि राहतील. ते दोघं चीनचेही शेजारी आहेत. चीन कुठल्याही रुपातल्या दहशतवादाला विरोध करतो. दोन्ही बाजूंनी शांतता, स्थिरता यांचा व्यापक विचार करून संयम बाळगावा आणि ही परिस्थिती आणखी गुंतागुंतीची बनेल असं पाऊल उचलणं टाळावं.'

  10. भारताच्या हवाई हल्ल्यानंतर आतापर्यंत काय-काय घडलं?

    भारतीय सैनिक

    फोटो स्रोत, Getty Images

    भारतीय सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर गेल्या काही तासांमध्ये बरंच काही घडलं आहे. जर तुम्ही आमच्या लाईव्ह पेजवर नुकतेच आला असाल तर आतापर्यंत काय घडलं ते जाणून घेऊ.

    • जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या दोन आठवड्यांनंतर, भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी हल्ले केले आहेत.
    • भारताने या हल्ल्यांना 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव दिले आहे.
    • भारताने म्हटले आहे की त्यांनी पाकिस्तानमधील नऊ ठिकाणी हल्ला केला आहे.
    • पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी हल्ल्यात आठ पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आणि या हल्ल्यांमध्ये इतर 35 जण जखमी झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
    • भारतीय लष्कराच्या प्रवक्त्यांनी बीबीसीला सांगितलं की, काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
    • पाकिस्तान आणि भारताने अनेक भागात शाळा आणि महाविद्यालये बंद केली आहेत.
    • भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केल्यानंतर, अनेक विमान कंपन्यांनी प्रवासी सूचना जारी केल्या आहेत.
  11. जम्मू-काश्मीरच्या सीमा भागात गोळीबार, वातावरण तणावपूर्ण, माजिद जहांगीर, श्रीनगरहून बीबीसी प्रतिनिधी

    भारतीय सैनिक

    पाकिस्तान आणि पाकिस्तान प्रशासित काश्मीरमध्ये भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर जम्मू-काश्मीरच्या सीमा भागातील पूंछ, राजौरी, मेंढर आणि उरी सेक्टरमध्ये गोळीबार झाल्याच्या बातम्या येत आहेत.

    गोळीबारामुळे या भागात गोंधळाची परिस्थिती आहे. पूंछमधील स्थानिक रहिवासी जमरोद मुघल यांनी बीबीसी न्यूजशी फोनवर बोलताना म्हटलं की, जम्मूमधील पूंछ सेक्टरमध्ये स्फोटांचे आवाज येत आहेत.

    त्यांनी पुढे म्हटलं की, लोक हॉस्पिटल आणि अन्य सुरक्षित ठिकाणी आश्रय घेत आहेत. मुघल यांनी सांगितलं की, एक गोळा पूंछमधील मुख्य बाजारातील वन विभागाच्या कार्यालयाजवळ येऊन पडला.

    तिथे परिस्थिती तणावपूर्ण आहे. उरी सेक्टरमध्ये बुधवारी सकाळी गोळीबार झाल्याच्या वृत्ताला एका पोलिस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. मात्र, त्यांनी याहून अधिक माहिती दिली नाही.

  12. भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला काय म्हटलं?

    पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, 'इस्लामाबादने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला (UNSC) भारताच्या आक्रमकतेबद्दल आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला निर्माण होणाऱ्या धोक्याबद्दल माहिती दिली आहे.

    त्यात म्हटले आहे की, "संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला कळविण्यात येते की पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरच्या कलम 51 अंतर्गत स्वसंरक्षणाचा अधिकार आहे. या अधिकारांतर्गत आम्ही निवडू त्या ठिकाणी आम्ही ठरवू त्या वेळी भारताच्या आक्रमणाला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आमच्याकडे आहे."

    पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी एक्सवर पोस्ट करून लिहिलं आहे की, "पाकिस्तान भारताने केलेल्या आक्रमणाचा तीव्र निषेध करतो. हा हल्ला पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे, संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरचे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करणारा आहे."

    पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार (फाइल फोटो)

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार (फाइल फोटो)
  13. या कारवाईविषयी विरोधी पक्षांनी काय म्हटलं?

    राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गटाचे) अध्यक्ष शरद पवार आणि माजी संरक्षणमंत्री शरद पवार यांनी या हल्ल्यानंतर एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉमर्वर प्रतिक्रिया व्यक्त करताना भारतीय जवानांचे अभिनंदन केलं आहे.

    त्यांनी म्हटलं आहे की, "आपल्या छातीवर गोळ्या झेलून भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्यदलावर प्रत्येक भारतीयाचा पूर्ण विश्वास आहे. आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राईक करून, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला."

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

    त्यांनी पुढे म्हटलं आहे की, "या कारवाईत पाकिस्तानी नागरिक किंवा पाक लष्कराच्या कोणत्याही ठिकाणाला धक्का न लावता, अतिरेक्यांच्या नऊ लक्ष्यांवर अचूक आणि नियोजित हल्ला करण्यात आला. भारतीय सैन्याच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. भारताचे सार्वभौमत्व आणि नागरिकांची सुरक्षा अबाधित राखणाऱ्या तसेच पहलगाम हल्ल्याचा योग्य प्रत्युत्तर देणाऱ्या सर्व भारतीय जवानांचे मन:पूर्वक अभिनंदन!"

    असदुद्दीन औवेसी

    फोटो स्रोत, Getty Images

    काँग्रेस अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी भारताने पाकिस्तावर केलेल्या कारवाईला समर्थन दिलं आहे.

    मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं की, "सध्याच्या घडीला राष्ट्रीय एकात्मता आणि ऐक्याची गरज आहे. त्यांनी पुढे म्हटलं की, काश्मीरमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या हल्ल्यानंतर (पहलगाममधील हल्ल्याचा संदर्भ) सीमेपलिकडील दहशतवादाविरोधातील निर्णायक कारवाईसाठी आमचा पक्ष सरकार आणि लष्कराच्या पाठिशी ठामपणे उभा आहे.

    एआयएमआयएम या पक्षाचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनीही भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईचं स्वागत केलं आहे.

  14. भारताने 'ज्या' इमारतीवर हल्ला केला त्या इमारतीचे फोटो

    भारताने ज्या ठिकाणी हल्ला केला त्या मुरीदके येथील इमारतीच्या बाहेरून बीबीसी उर्दूचे प्रतिनिधी उमर दराज यांनी हे फोटो आणि माहिती पाठवली आहे.

    भारताने अजूनही त्यांनी हल्ला केलेल्या ठिकाणांचा तपशील उघड केलेला नाही. दुसऱ्या बाजूला पाकिस्तानने 6 जागांवर हल्ला झाल्याची माहिती दिली आहे तर भारताने 9 ठिकाणी हल्ला केल्याचा दावा केला आहे.

    मुरीदके शहरातील इमारत
    फोटो कॅप्शन, मुरीदके हे एक छोटं शहर आहे. पाकिस्तानच्या लाहोरपासून हे शहर तीस ते चाळीस किलोमीटरवर आहे. भारताने ज्या इमारतीवर हा हल्ला केला आहे ती इमारत एका शैक्षणिक आणि आरोग्य संस्थेच्या मधोमध उभी आहे.
    अँब्युलन्स आणि अग्निशामक दलाच्या गाड्या
    फोटो कॅप्शन, या परिसराच्या बाहेर अँब्युलन्स आणि अग्निशामक दलाच्या गाड्या दिसत आहेत. नुकसान झालेल्या इमारतीमध्ये जाऊन बचावपथक काम करण्याचा प्रयत्न करत आहे. शिड्यांचा वापर करून ते मध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
    मुरीदके शहरातील इमारत
    फोटो कॅप्शन, या ठिकाणी जाण्यासाठी काही विशिष्ट एंट्री आणि एक्झिट पॉईंट्स बनवले आहेत तिथूनच मध्ये जाता येतं. सध्या या ठिकाणी पोलीस आणि संरक्षण दलाच्या जवानांचा पहारा आहे. इथे कुणालाही जाण्याची परवानगी नाही. पत्रकारांनाही मज्जाव करण्यात आला आहे, त्यामुळे आम्ही मध्ये जाऊन इमारतीचं नेमकं किती नुकसान झालं आहे हे बघू शकत नाही.
    मुरीदके शहरातील इमारत
    फोटो कॅप्शन, सध्या इथे सामान्य लोक नाहीयेत, फक्त बचाव कर्मचारी, सैनिक आणि पाकिस्तानी रेंजर्स आहेत. मला उध्वस्त झालेल्या इमारतीचा राडारोडा मोठ्या मैदानावर पसरलेला दिसत आहे.
  15. 'या' इंटरनॅशनल एअरलाइन्सकडून पाकिस्तानी हवाई क्षेत्रातून जाणारी उड्डाणं रद्द

    कतार एअरलाईन्सचं विमान

    फोटो स्रोत, Getty Images

    पाकिस्तानी हवाई हद्द बंद असल्यामुळे कतार एअरवेजने पाकिस्तानसाठीची विमान उड्डाणं रद्द केली आहेत.

    कतार एअरवेजने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंबंधीची माहिती देताना म्हटलं आहे की, या परिस्थितीवर आमचं बारकाईने लक्ष आहे आणि आमचे प्रवासी तसेच क्रू यांची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता आहे.

    एअरलाइनने प्रवाशांना कतार एअरवेजच्या अधिकृत वेबसाइटवरून ज्या विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे, त्याची माहिती घेण्याची सूचना केली आहे. पारिस्तानने लाहोर आणि कराची शहरांवरून जाणारी हवाई हद्द बंद करण्याची घोषणा केली आहे.

    सीएननसोबत बोलताना एअर फ्रान्स एअरलाइनने म्हटलं की, पुढील सूचना मिळेपर्यंत त्यांनी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून जाणारी उड्डाणं रद्द केली आहेत आणि काही ठिकाणांसाठी ते आपल्या उड्डाणांमध्ये बदल करत आहेत.

    जर्मन एअरलाइन लुफ्तांसानेही रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितलं की, पुढच्या सूचनेपर्यंत आम्ही पाकिस्तानी हवाई हद्दीतून जाणार नाहीये.

  16. भारताचा पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला, दोन्ही देशांकडे किती सैन्य आणि शस्त्रास्त्रं?

    भारतानं पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे.

    भारतीय सैन्यानं 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केलं आहे. याबाबत भारत सरकारने काही काळापूर्वी एक निवेदन जारी करून माहिती दिली आहे.

    भारत-पाकिस्तानमधील या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधील लष्करी बलाबल किती आहे, दोन्ही देशांकडे किती शस्त्रास्त्रं आहेत याची माहिती जाणून घ्या. सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

    भारत सरकारने आपल्या निवेदनात म्हटलं आहे, "या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करण्यात आलं आहे. याच ठिकाणावरून भारतावर दहशतवादी हल्ल्यांचा कट झाला आणि त्याची अंमलबजावणी करण्यात आली,"

    भारतीय सैनिक

    फोटो स्रोत, NASIR KACHROO/NURPHOTO VIA GETTY IMAGES

    ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये एकूण 9 ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं आहे, अशीही माहिती निवेदनात दिली आहे.

    रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानच्या सीमावर्ती भागातूनही जोरदार गोळीबार आणि मोठ्या स्फोटांच्या बातम्या येत आहेत.

  17. भारत प्रशासित काश्मीरमधील शाळा बंद करण्याचा निर्णय, शफत फारुख, श्रीनगर

    भारत प्रशासित काश्मीरमधील जम्मू, सांबा, कठुआ, राजौरी आणि पूंछ परिसरातील शाळा, महाविद्यालयं आणि शैक्षणिक संस्था बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

    या संस्था आज बंद राहतील. त्याआधी, भारतीय सैन्याने सांगितले की पाकिस्तानने भिंबर गली परिसरात भारत-प्रशासित काश्मीरमध्ये हल्ला तोफांच्या साहाय्याने केला आहे.

    स्थानिकांनी या परिसरात स्फोटांचे आवाज ऐकल्याची माहिती बीबीसीला दिली आहे.

    दुसरीकडे, पाकिस्तानने देखील राजधानी इस्लामाबाद आणि पंजाब प्रांतातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलं आहे. भारताच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची तयारी करत असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं पाकिस्तानच्या सरकारने म्हटलं आहे.

  18. पाकिस्तानच्या कारवाईत तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती

    भारतीय सैनिक

    फोटो स्रोत, Getty Images

    भारतीय संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "पाकिस्तानी लष्कराने भारत प्रशासित काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईत तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे."

    "पाकिस्तानच्या सैन्याने जम्मू-काश्मीरच्या सीमारेषेजवळ केलेल्या कारवाईत या भारतीय नागरिकांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. भारतीय लष्कर पाकिस्तानला योग्य ते प्रत्युत्तर देत आहे," असंही भारतीय लष्करानं सांगितलं.

  19. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?

    अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो

    अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटलं आहे की, ते भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

    अमेरिकेतील भारतीय दूतावासाने सांगितले की भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी रुबियो यांच्याशी चर्चा केली आहे आणि 'त्यांना भारताने केलेल्या कारवाईची माहिती दिली आहे.'

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही भारताच्या हल्ल्याबद्दल माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर दिले होते आणि हा हल्ला 'लज्जास्पद' असल्याचं तर म्हणाले होते.

    मार्को रुबियो म्हणाले की अमेरिकन राष्ट्राध्यक्षांप्रमाणेच त्यांनाही असं वाटतं की, हा तणाव लवकर संपेल.

    ते असेही म्हणाले की, दोन्ही देशांमध्ये 'शांततापूर्ण तोडगा' निघावा यासाठी ते भारतीय आणि पाकिस्तानी नेतृत्वाशी संपर्क साधत राहतील.

  20. भारत आणि पाकिस्तानच्या नेत्यांनी 'जोखीम' पत्करली आहे का?, अनबरासन एथिराजन, दक्षिण आशिया संपादक, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस

    भारत आणि पाकिस्तान या दोन अण्वस्त्रधारी देशांमधील तणाव वाढत आहे.

    गेल्या काही दिवसांपासून भारत पाकिस्तानविरुद्ध काहीतरी लष्करी कारवाई करू शकतो अशी भीती व्यक्त केली जात असली तरी, ज्या प्रमाणात हे हल्ले झाले ते अनेकांना आश्चर्यचकित करणारे आहे.

    भारताचे म्हणणे आहे की त्यांनी पाकिस्तानमध्ये ज्या काही ठिकाणी बॉम्बहल्ला केला होता त्यातील काही ठिकाणं अतिरेक्यांशी संबंधित होते आणि त्यांनी पाकिस्तानच्या लष्करी तळांवर हल्ले केलेले नाहीत.

    नरेंद्र मोदी आणि शाहबाज शरीफ

    फोटो स्रोत, Getty Images

    पाकिस्तानने म्हटले आहे की, पाकिस्तान योग्य ते प्रत्युत्तर देईल. भारताची पुढील कारवाई देखील पाकिस्तानच्या कारवाईच्या स्वरूपावर अवलंबून असेल.

    दोन्ही देशांना असं वाटतं की ते तणाव वाढण्यापासून रोखू शकतात, पण परिस्थिती गंभीर आहे आणि लष्करी संघर्ष आता कोणत्या दिशेने जाईल हे सांगणे कठीण आहे.

    याआधी, अमेरिका आणि इतर देश भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

    अशा परिस्थितीत, सध्या इतर जागतिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणारे ट्रम्प प्रशासन दोन्ही देशांमधील वाढता तणाव कमी करण्यासाठी कोणती पावले उचलते आणि किती लवकर हे केलं जातं ते पाहावं लागेल.

    दरम्यान, दोन्ही देशांचे नेते त्यांच्या नागरिकांना दाखवू इच्छितात की त्यांनी निर्णायक पावले उचलली आहेत आणि त्यात ते यशस्वी झाले आहेत. पण परिस्थिती कधीही नियंत्रणाबाहेर जाऊ शकते.