नेपाळ सीमेवर गोळीबार, 1 मृत्युमुखी, दोन जखमी

फोटो स्रोत, SEETU TIWARI
भारताच्या सीमेवर नेपाळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक जण ठार तर दोन जण जखमी झाले आहेत. भारत-नेपाळ सीमेवर सीतामढी जिल्ह्यात ही घटना घडली. पीटीआय आणि एएनआय वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?

मिळालेल्या माहितीनुसार, काही स्थानिक भारतीय भारतातून नेपाळमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात होते. त्यांना पाहून नेपाळच्या सशस्त्र पोलीस दलाने गोळीबार केला. यात एक जण ठार तर दोन जखमी झाले आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
पण हा गोळीबार कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत स्पष्टता नाही.
नेपाळ पोलिसांच्या म्हणण्यानुसार, भारतीय नागरिकांनी त्यांच्याकडून शस्त्र हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी 5 भारतीयांवर गोळी झाडली. त्यात एकाचा मृत्यू झाला. विकेश उर्फ विकास असं मृत व्यक्तीचं नाव असल्याची माहिती मिळाली आहे. तर एक जखमी भारतीय नागरिक नेपाळ पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
सदर व्यक्ती तस्करी करणारे लोक असून ते सुरुवातीला छोट्या संख्येने येतात. पण नंतर ते प्रचंड मोठ्या संख्येने येतात, असं नेपाळच्या सापतारी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मोहन बहादूर बी. सी. यांनी सांगितलं आहे. याप्रकरणी बिहार पोलीस लवकरच एक पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.
सीमा सुरक्षा दलाचे डीजी कुमार राजेश चंद्र यांनी एएनआयशी बोलताना सांगितले, सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी एक कुटुंब नेपाळमध्ये जात होते. त्यांना नेपाळी संरक्षण दलाने थांबवले व माघारी जाण्यास सांगितले. वादावादी जाल्यानंतर नेपाळकडून गोळीबार करण्यात आला त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)



















