यमुना एक्सप्रेसवेवर बसला अपघात: 29 जणांचा मृत्यू, वीसहून अधिक जण जखमी

फोटो स्रोत, VIVEK JAIN
उत्तर प्रदेशमध्ये यमुना एक्सप्रेसवेवर आग्र्याजवळ एका बसला अपघात झाला आहे. या अपघातात 29 लोकांचा मृत्यू झाला असून वीसहून अधिक लोक जखमी झाले आहेत.
उत्तर प्रदेश रोडवेजची ही बस लखनौहून दिल्लीला येत होती. आग्र्याजवळ बस झरना नाल्यामध्ये कोसळली.
सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.
आग्र्याचे जिल्हाधिकारी एनजी रवी कुमार, एसएससी बबलू कुमार हे घटनास्थळी उपस्थित आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी 29 लोकांचा मृत्यू झाल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेची माहिती घेतली असून मृतांप्रति शोक व्यक्त केल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं सांगितलं आहे. जखमींना तातडीनं वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
उत्तर प्रदेश रोडवेजनं मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
















