ऊस लागवड पद्धतीमध्ये बदल करून एकरी 100 टन उत्पन्न शक्य आहे का?
महाराष्ट्रात शेतीच्या अर्थकारणात ऊसाला महत्त्वाचं स्थान आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात. ऊसामुळे इथं शेतीचा कायापालट झाला आहे.
पण पाण्याचा आणि खतांचा अमाप वापर, कसहीन होत चाललेल्या जमिनी, बदलतं हवामान आणि नवीन रोगांचा फटका यामुळे ऊसाचं उत्पन्न आणि साखरेचा उतारा कमी होतो आहे.
त्यामुळेच शेतीत महत्त्वाचे बदल व्हायला हवेत, असं संशोधक सांगतात. तर डॉ. अंकूश चोरमुले यांनी असेच काही बदल प्रत्यक्षात आणले आहेत.
त्यांनी राहुरी विद्यापीठातून पीएचडी केली आणि सध्या ते सांगली जिल्ह्यातील आष्टा इथे आपल्या घरच्याच ऊसच्या शेतीमध्ये प्रयोग करतायत. पाहा बीबीसी प्रतिनिधी गणेश पोळ यांचा हा खास रिपोर्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)