म्यानमारचे जवळपास 12 पोलीस भारतात पलायन करुन का आले आहेत?
Published
म्यानमारमधील जवळपास बारा पोलीस अधिकाऱ्यांनी मिझोरम सीमेच्या मार्गातून भारतात पलायन केलं. त्यांनी का पलायन केलं यांच्या कहाण्या त्यांनी बीबीसीला सांगितल्या.
आपल्याच लोकांवर गोळ्या झाडायला लष्कराने आदेश दिल्यामुळे तिथून ते भारतात पळून आले असं त्यांनी सांगितलं. गेल्या महिन्यात लष्कराने म्यानमारमधील सत्ता हाती घेतल्यानंतर तिथे लोकशाहीच्या समर्थनार्थ तीव्र आंदोलन सुरू आहे. बीबीसीच्या प्रतिनिधी रजनी वैद्यनाथन यांचा मिझोराममधून रिपोर्ट.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)