महाराष्ट्रातल्या रुग्णांची संख्या 37 हजार 158 वर पोहोचली
राज्य सरकारने चौथ्या लॉकडाऊनसाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
लाईव्ह कव्हरेज
कोरोनामुळे शेतकरी आणि डेअरी उत्पादकांवर असं कोसळलंय संकट
भारतात चीनपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त, पण दोन देशांची तुलना होऊ शकते का?
चौथ्या लॉकडाऊनमध्ये राज्यात काय सुरू, काय बंद राहणार?
आज दिवसभरात काय घडलं?
कोरोना व्हायरसबाबत आज दिवसभरातील अपडेट आपण इथे पाहिले. आजचे अपडेट आपण इथेच थांबवतोय.
उद्या नवीन बातम्यांसह भेटू आणि नवीन अपडेट जाणून घेऊ. मात्र, तुम्हाला गुड नाईट म्हणण्याआधी आज दिवसभरात काय काय घडलं, याचा एक धावता आढावा घेऊया :
- महाराष्ट्रात आज 2100 नवे रुग्ण आढळले. त्यामुळं महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या 37 हजार 158 वर पोहोचली आहे.
- राज्य सरकारकडून चौथ्या लॉकडाऊनसाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी
- मुंबईतील ‘बेस्ट’च्या आणखी 9 कर्मचाऱ्यांचा कोरोनाची लागण, लागण झालेल्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 137 वर पोहोचली
- पदवीची म्हणजेच विद्यापीठाच्या अंतिम वर्षाची परीक्षा यावर्षी रद्द करण्यात यावी आणि गेल्या वर्षीच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचा निकाल लावता येईल का? अशी विचारणा महाराष्ट सरकारनं विद्यापीठ अनुदान आयोगाला म्हणजेच UGC ला केलीय.
- मुंबईतील वांद्रे रेल्वेस्थानकाबाहेर आजही अनेक स्थलांतरित मजूर गोळा झाले होते. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर गर्दी कमी होण्यास मदत झाली.
- देशात कोरोनाग्रस्तांची संख्या एक लाखावर, कोरोनाची जन्मभूमी चीनलाही मागे टाकलं
- 1 जून 2020 पासून दिवसाला 200 ट्रेन धावतील, अशी माहिती भारतीय रेल्वेनं ट्विटरवरून दिलीय. या ट्रेन वातानुकूलित नसतील. शिवाय, द्वितीय श्रेणी कोचच्या या ट्रेन असतील. अडकलेल्या मजुरांसाठी चालवण्यात येणाऱ्या श्रमिक स्पेशल ट्रेनशिवाय या अतिरिक्त 200 ट्रेन असतील, असं भारतीय रेल्वेनं स्पष्ट सांगितलंय.
- स्विगी कंपनीने 1,100 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले, जगभरात उबरमध्ये काम करणाऱ्या 3,000 लोकांना काढलं
- ईदसाठी उत्तर प्रदेशच्या घरी आलेले नवाझुद्दीन सिद्दीकी हे कुटुंबीयांसह 14 दिवस होम क्वारंटीनमध्ये.
- राज्यात आजपर्यंत 70 हजार उद्योग सुरू करण्यास परवानगी, 50 हजार प्रत्यक्षात सुरू - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- कोरोनाला रोखण्यासाठी दीड आठवड्यांपासून हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषध घेतोय - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप
उद्या पुन्हा भेटू... बीबीसी मराठीच्या वेबसाईटवर...
ईशान्य भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या का आहे कमी?
कोरोनापासून बचाव करण्यासाठी या सलूनमध्ये चक्क पीपीई किट घालून केस कापले जातात.
मुंबईत 'समोसा पार्टी' आयोजित करणाऱ्यांनावर गुन्हा दाखल
मुंबईतील घाटकोपरमधील सोसायटीत समोसा पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईत कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जारी करण्यात आलं असताना, अशा प्रकारची पार्टी आयोजित केल्यानं पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे.
“सोसायटीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. सोसायटीचे सचिव आणि आयोजक दोघांची नावे घेतली आहेत. समोसा आणि संगीत कार्यक्रम सुरू होता. किती लोकं होते याची माहिती घेत आहोत,”अशी माहिती घाटकोपरमधील पंतनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास कांबळे यांनी दिली.

फोटो स्रोत, Social Media
एक जूनपासून दिवसाला 200 ट्रेन धावतील - भारतीय रेल्वे
1 जून 2020 पासून दिवसाला 200 ट्रेन धावतील, अशी माहिती भारतीय रेल्वेनं ट्विटरवरून दिलीय. या ट्रेन वातानुकूलित नसतील. शिवाय, द्वितीय श्रेणी कोचच्या या ट्रेन असतील.
अडकलेल्या मजुरांसाठी चालवण्यात येणाऱ्या श्रमिक स्पेशल ट्रेनशिवाय या अतिरिक्त 200 ट्रेन असतील, असं भारतीय रेल्वेनं स्पष्ट सांगितलंय.
लवकरच ऑनलाईन बुकिंग सुरू केली जाईल. तिकीट बुकिंगबाबत अद्याप सविस्तर माहिती रेल्वेकडून देण्यात आली नाहीय.
दरम्यान, लॉकडाऊनमुळे विविध राज्यात अडकलेल्या मजुरांना आपापल्या राज्यात नेण्यासाठी आतापर्यंत 1600 श्रमिक स्पेशल ट्रेन धावल्या. यातून 21.5 लाख मजुरांना रेल्वेनं आपापल्या राज्यात पोहोचवलं.

फोटो स्रोत, Twitter
फोटो कॅप्शन, भारतीय रेल्वेनं ट्वीट करून नव्यानं सुरू होणाऱ्या ट्रेनबद्दल माहिती दिली. गुजरातमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 12,141 वर पोहोचली
गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगानं वाढताना दिसतेय. गुजरातमधील रुग्णांची एकूण संख्या 12 हजार 141 वर पोहोचलीय.
एकट्या अहमदाबादमध्ये 8 हजार 945 रुग्ण आढळले आहेत.

फोटो स्रोत, Twitter
लॉकडाऊन - 4 : महाराष्ट्रात काय सुरू, काय बंद राहणार?
‘लॉकडाऊनमध्ये सिंगल आणि एकटे असाल तर सेक्स बडी शोधा'
रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी लस सापडली?
महाराष्ट्रातल्या रुग्णांची संख्या 37 हजार 158 वर पोहोचली
महाराष्ट्रात आज 2100 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या 37 हजार 158 वर पोहोचली आहे.
महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही आकडेवारी दिल्याचं PTI नं सांगितलंय.

फोटो स्रोत, Twitter
दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0मध्ये कुठे काय सुरू?
परदेशातून महाराष्ट्रात आतापर्यंत 1,972 नागरिक आले
वंदे भारत अभियानांतर्गत 10 देशातून 13 फ्लाईट्सद्वारे 1,972 नागरिक महाराष्ट्रात आले आहेत. यात मुंबईतील 822 प्रवासी आहेत, उर्वरित महाराष्ट्रातील 1,025, तर इतर राज्यातील 125 प्रवासी असल्याची माहितीही मुख्यमंत्री कार्यालयानं दिली.
अजून 27 फ्लाईटसने परदेशात अडकलेले नागरिक महाराष्ट्रात येणे अपेक्षित आहेत.
कुठल्या देशातून किती नागरिक परतेल?
- लंडनहून 653
- सिंगापूरहून 243
- मनिलाहून 150
- सॅन फ्रान्सिस्कोहून 107
- ढाक्याहून 107
- न्यूयॉर्कहून 208
- क्वाललंपूरहून 201
- शिकागोहून 195
- कुवेतहून 2
- आदिस अबबावरून 78
- काबूल 12
- मस्कत-ओमानहून 16
वर्ल्ड हेल्थ असेम्बली कोरोनाबाबत स्वतंत्र चौकशी करणार
कोरोना व्हायरसबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी वर्ल्ड हेल्थ असेम्बली करणार आहे.
ऑस्ट्रेलिया, चीन आणि जपानसह 100 देशांच्या वतीन युरोपीयन महासंघाद्वारे यासंबंधीचा प्रस्ताव वर्ल्ड हेल्थ असेम्बलीच्या वार्षिक सभेत ठेवण्यात आला होता. या प्रस्तावावर कुणीही आक्षेप नोंदवला नाही.
बहामाचे राजदूत आणि वर्ल्ड हेल्थ असेम्बलीचे अध्यक्ष केवा बैन यांनी सांगितलं, "कुणीही प्रस्तावावर आक्षेप नोंदवला नसल्यानं या प्रस्तावाशी सर्वजण सहमत आहेत असं ग्राह्य धरतो."
BEST च्या आणखी 9 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
मुंबईतील BEST च्या आणखी 9 कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण झालीय. त्यामुळे लागण झालेल्या एकूण BEST कर्मचाऱ्यांची संख्या 137 वर पोहोचली आहे. BEST च्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी ANI ला ही माहिती दिली.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
स्थलांतरित मजूर गावी चालल्यामुळे मुंबई-पुणे ठप्प होईल का?
मुंबईत परराज्यांमधील हजारो-लाखो लोक कामसाठी स्थायिक झालेले आहेत. मात्र, हे लोक परत आपापल्या गावी गेल्यास मुंबई ठप्प होईल का? पाहा यावरील सोपी गोष्ट :
'कधीतरी हे सगळं संपेल आणि मी परत घरी जाईन'- कोरोना वॉरियरची गोष्ट
