आज दिवसभरात काय घडलं?
महाराष्ट्रातील रुग्णांच्या संख्येनं आज 30 हजाराचा आकडा पार केला, तर केंद्रीय अर्थमंत्रालयानं कोळसा, हवाई वाहतूक, संरक्षण अशा विविध क्षेत्रात आज सुधारणेच्या दृष्टीनं महत्त्वाच्या घोषणा केल्या.
आज दिवसभरात अशा अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. मात्र, आजचे अपडेट इथे थांबवण्याआधी आज काय घडलं, यावर एक नजर टाकू.
- महाराष्ट्रात आज 1606 नवे रुग्ण आढळले. महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या 30706 एवढी झालीय.
- महाराष्ट्र सरकारनं आतापर्यंत 1,49,798 मजुरांना एसटीच्या माध्यमातून राज्याच्या सीमेवर सोडलं
- वानखेडे स्टेडियममध्ये आता क्वारंटीन केंद्र असणार आहे, महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्टेडियमची पाहणी केली.
- देशभरात गेल्या 24 तासात, कोरोनाचे 3970 नवीन रुग्ण आढळले असून, 103 जणांचा मृत्यू झाला आहे.
- भारतातील संरक्षण क्षेत्रातली FDI ची मर्यादा 74 टक्क्यांपर्यंत वाढवली
- कोळसा उत्पादन क्षेत्रात सरकार 50,000 कोटी गुंतवणार - निर्मला सीतारमण
- आतापर्यंत 14 लाख लोकांना रेल्वेनं घरी पोहोचवलं - रेल्वे मंत्रालयाची माहिती
- काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक पॅकेजवर टीका केली आहे.
- उत्तर प्रदेशात औरेया इथं स्थलांतरित मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला झालेल्या अपघातात 23 जणांचा मृत्यू झाला आहे.
- वर्ल्ड बँकेकडून भारतासाठी 1 अब्ज अमेरिकन डॉलर्सचं विशेष पॅकेज
- कोरोना व्हायरसमुळे ब्रिटनमध्ये मृतांची संख्या 34,078 झालीय.
आता आपण उद्या बीबीसी मराठीच्या वेबसाईटवर नव्या अपडेट्ससह भेटू. धन्यावद...!



