राज्यात अडकलेल्या नागरिकांसाठी 10 हजार एसटी बसेस धावणार
महाराष्ट्रात विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना मिळणार घरी जाता येणार आहे. राज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांना राज्य शासन एसटीद्वारे स्वगावी मोफत सोडणार असल्याची घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
"येत्या चार- पाच दिवसात 10 हजार एसटी बस फेऱ्याद्वारे ही प्रक्रिया होणार पूर्ण होणार आहे. विद्यार्थी, यात्रेकरू या सर्वांनाच याचा लाभ मिळणार आहे. हा संपूर्ण खर्च आपत्ती व्यवस्थापन-मदत पुनर्वसन विभाग उचलणार आहे."
"येत्या 4-5 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. यासाठी राज्य परिवहन विभागाच्या सुमारे 10 हजार एस. टी. फे-यांचे नियोजन करण्यात आले आहे," असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या योजनेला होकार दिला आहे. कोरोना नियमांचे पालन करून ही प्रवासी वाहतूक केली जाणार आहे. आपत्ती व्यवस्थापन विभाग याचा खर्च उचलणार असल्याचं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.