You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

राज्यात आज 232 नवे रुग्ण तर 295 बरे झाले, एकूण 2,916 बाधित

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. आजपासून देशात काय सुरू, काय बंद? - वाचा लॉकडाऊन नियमावली

  2. अफवा, अस्वस्थता की षड्यंत्र – वांद्रे स्टेशनबाहेर परप्रांतीय मजुरांची गर्दी का झाली?

  3. प्लाझ्मा थेरपी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी किती प्रभावी?

  4. मुख्यमंत्र्यांचा खासगी रुग्णालयांशी संवाद

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे मुंबईतील कॉर्पोरेट रुग्णालयांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नुकत्याच स्थापन झालेल्या टास्कफोर्सचे डॉक्टर्स यांच्यासोबत कोरोना रुग्णांवरची उपचार पद्धती, रुग्णांना कसे वाचवायचे व इतर वैद्यकीय मुद्द्यांवर चर्चा झाली, असं मुख्यमंत्री कार्यालयातर्फे सांगण्या आलं.

  5. मालेगावात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यामध्ये नेमकी कुठे चूक झाली?

  6. दिल्लीत कोरोना व्हायरसग्रस्तांच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरपीची चाचणी

    दिल्लीत कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्याबाबत चाचणी घेण्यात येणार आहे, अशी माहिती नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी दिली आहे.

    कोव्हीड-19 च्या रुग्णांवर उपचार करताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करून हा उपचार करण्यात येईल, असं राज्यपाल बैजल यांनी सांगितलं.

    >

  7. राज्यात आज 232 नवे रुग्ण

  8. राहुल कुलकर्णाला अटक हा पत्रकार स्वातंत्र्यावर घाला - 'एबीपी माझा'ची भूमिका

    ‘एबीपी माझा’चे संपादक राजीव खांडेकर यांनी या संपूर्ण घटनेबाबत आपली भूमिका सविस्तर संध्याकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्या वाहिनीवर मांडली. ते म्हणाले...

    “दक्षिण मध्य रेल्वेच्या एका मीटिंगमधल्या पत्रावरच आधारित बातमी सकाळी 9 वाजता एबीपी माझाने दिली, मात्र त्यानंतर पंतप्रधान मोदी सकाळी 10 वाजता बोलले तेव्हा त्यांना स्पष्ट केलं की कुठल्याही सेवा सुरू राहणार नाही. त्यामुळे ही बातमी एबीपी माझावर सकाळी 9 नंतर चालली नाही.

    त्यानंतर खुद्द रेल्वेने सकाळी 11वाजता जाहीर केलं की सर्व रेल्वे सेवा पूर्णपणे बंद राहतीलच. मात्र काल सकाळी 11 वाजेपर्यंत रेल्वेची तिकीटविक्री सुरूच होती.

    त्यानंतर दुपारी चार वाजता वांद्रे रेल्वे स्थानकावर लोक एकत्र आले. हे लोक कसे एकत्र आले, कुणी आणले, हा वेगळा अभ्यासाचा विषय आहे.

    नंतर हा जमाव पांगवण्यात आला, मात्र त्यानंतर काही जणांनी या जमावाचा संबंध एबीपी माझाच्या बातमीशी जोडला.

    आता यातून काही प्रश्न उपस्थित होतात –

    • हे लोक, जे महाराष्ट्राबाहेरील आहेत, बहुतांश बंगालला जाणारे होते, ते एबीपी माझाची बातमी पाहून कसे आले असतील? आणि त्यांच्यापैकी कुणाच्याच हाती साधी पिशवीसुद्धा का नव्हती?
    • दुसरी गोष्ट, वांद्रे स्टेशनवरून कुठलीही ट्रेन उत्तर भारत किंवा बंगालसाठी सुटत नाही. त्यासाठी सेंट्रलहून किंवा CST हून रेल्वे सुटतात. मात्र हे लोक वांद्र्यात का एकत्र आले?
    • याच्यामध्ये, यांना कुणी आणलं? का आणलं? हा सगळा संशोधनाचा विषय आहे. मात्र याचा संबंध एबीपीवर दाखवलेल्या सकाळच्या बातमीशी कसा जोडण्यात आला?

    त्याच दरम्यान, असे काही व्हीडिओ आले जिथे काही लोक तिथे जमलेल्यांना सांगतायत की आज 15 हजार घेतल्याशिवाय इथून जायचं नाही. त्यामुळे हा जमाव नेमका कुणी गोळा केला होता? त्यांना कुणी इथे येण्यास सांगितलं होतं, हा संशोधनाचा विषय आहे.

    त्यामुळे राहुल कुलकर्णीसारख्या जबाबदार पत्रकारावर असा आरोप करून त्यांना अटक करणं, हा एबीपी माझावर अन्याय करणारा, पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर हल्ला करणारा प्रकार आहे.

    दुसरं म्हणजे, ज्या पत्राच्या आधारावर ही बातमी देण्यात आली, तेच पत्र आज दिल्लीतील काही काँग्रेसच्या नेत्यांनी एका पत्रकार परिषदेत दाखवत विचारणा केली की असं कसं एका बैठकीतलं पत्र बाहेर फुटू शकतं? आणि त्याच काँग्रेसचं महाराष्ट्रात सरकार आहे, त्यामुळे हे कितपत योग्य आहे, याचा विचार महाराष्ट्राची सूज्ञ जनता आणि सरकार करेल, असा एबीपी माझाला विश्वास आहे.

  9. आजचा #CoronaPodcast

    कोरोनाविषयी आज दिवसभरात काय घडलं? सांगतायत आशिष दीक्षित आणि विनायक गायकवाड

  10. वांद्रे स्टेशन गर्दीप्रकरणी रेल्वेबाबत अफवा पसरवणाऱ्या 30 खात्यांची ओळख पटली

    लॉकडाऊनच्या काळात रेल्वेची सोय करण्यात येत असल्याच्या अफवा पसरवण्यात आल्यामुळे मुंबईच्या बांद्रा रेल्वे स्थानकावर काल मोठी गर्दी उसळली होती.

    महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर विभाग गेल्या काही दिवसांपासून सातत्याने फेसबुक, ट्विटर, टिकटॉक, इंस्टाग्राम यांच्यासह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नजर ठेवून आहे. त्या माध्यमातून अफवा पसरवणाऱ्या खात्यांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं आहे.

    सोशल मीडिया मॉनिटरिंगच्या माध्यमातून 14 एप्रिलपर्यंत राज्याच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये 201 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये 35 जणांना अटक करण्यात आली असून आणखी 114 जणांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे.

  11. पंजाबात कोरोनाग्रस्तांची संख्या 186 वर

    पंजाबमध्ये आज कोरोना व्हायरसची लागण झालेले 2 रुग्ण आढळून आले. त्यामुळे पंजाबातली कोरोनाग्रस्तांची संख्या 186 वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत 13 जणांचा कोव्हिड-19 मुळे मृत्यू झाला असून 27 जण बरे झाले आहेत, अशी माहिती पंजाब सरकारने दिली आहे.

  12. कर्नाटकात कोरोना व्हायरसग्रस्तांची संख्या 279 वर, 12 जणांचा मृत्यू

    कर्नाटकात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 279 वर पोहोचल्याची माहिती तिथल्या राज्य सरकारने दिली आहे.

    बुधवारी राज्यात 19 नवे रुग्ण आढळून आले. आतापर्यंत राज्यात कोरोना व्हायरसमुळे 12 जणांचा मृत्यू झाला असून 80 जण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याचं सरकारने सांगितलं आहे.

  13. भारतात समूह संसर्गाला खरंच सुरुवात झाली आहे का? । सोपी गोष्ट

  14. कोरोना व्हायरसवर उपाययोजना करण्यात भारत पहिल्या देशापैकी एक

    कोरोना व्हायरसचा प्रसार चीनमध्ये होत असल्याची बातमी समोर आल्यानंतर त्याच्यावर उपाययोजना करणाऱ्या आघाडीच्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे, असं वक्तव्य केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केलं आहे.

    7 जानेवारीला चीनमध्ये कोरोना व्हायरसचं पहिलं प्रकरण समोर आलं. त्यानंतर 8 जानेवारी रोजी तातडीने तज्ज्ञांची बैठक घेण्यात आली. 17 जानेवारीला आम्ही आरोग्यविषयक मार्गदर्शिका दिली होती, असं डॉ. हर्षवर्धन म्हणाले.

  15. देशातील आतापर्यंत 11,439 रुग्ण, 377 जणांचा मृत्यू

    कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची देशातील संख्या सध्या 11,439 पर्यंत पोहोचली असून सुमारे 377 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी दिली.

    गेल्या 24 तासांत भारतातील रुग्णांमध्ये 1,076 रुग्णांची भर पडली आहे, तसंच 270 रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1,306 कोरोनाग्रस्त आतापर्यंत बरे झाले आहेत, असंही लव अगरवाल यांनी सांगितलं.

    आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे

    • कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा वेग लक्षात घेता देशाची हॉटस्पॉट, नॉन-हॉटस्पॉट आणि ग्रीन झोन अशी तीन भागात विभागणी करण्यात आली आहे.
    • देशात सध्या 170 जिल्हे कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत. इथं प्रसाराचा वेग जास्त आहे. तर इतर 270 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे.
    • काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याचं जाहीर केलं होतं. त्याअंतर्गत 20 एप्रिलपर्यंत प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात येणार आहे.
    • हा आढावा घेण्यासाठी राज्य सरकारसाठी नवीन नियमावली देण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीचा आपल्याला सदुपयोग करायचा आहे.
    • केंद्रीय सचिवांची राज्य सरकारांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. त्यामध्ये राज्यांना केंटेनमेंट झोनबाबत मार्गदर्शन करण्यात आलं आहे. कंटेनमेंट झोनसाठी विशेष पथक बनवण्यात येईल. त्यांच्यामार्फत परिसरातील सर्व नियोजन केलं जाईल.
    • ही पथके स्वतः जाऊन तपासणी करणार आहेत. त्यांना स्थानिक प्रशासन, नेहरू युवा केंद्र, रेड क्रॉस आणि स्वयंसेवी संस्थांची मदत घेता येईल.
    • प्रत्येक जिल्ह्यात कोव्हिड रुग्णालय बनवण्यात यावं. इथं त्यांच्यावर उपचार करण्यात यावेत, अशी सूचना करण्यात आली आहे.
  16. केंद्र सरकारची पत्रकार परिषद

    दर 24 तासांनी देशातील कोरोना व्हायरसच्या स्थितीचा आढावा घेणारी केंद्र सरकारची पत्रकार परिषद सुरू झाली आहे.

    पाहा इथे -

  17. भारतीय रेल्वेचा 1 लाख 30 हजार PPE बनवण्याचा संकल्प

    कोरोना व्हायरसविरुद्ध लढत असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी भारतीय रेल्वेने पुढाकार घेतला आहे.

    एप्रिल महिन्यात सुमारे 30 हजार PPE किट (वैयक्तिक सुरक्षा उपकरण) तयार करण्याचं भारतीय रेल्वेचं नियोजन आहे. तर मे महिन्यात तब्बल 1 लाख PPE किट बनवण्याचं उद्दीष्ट रेल्वेनं ठेवलं आहे, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे.

  18. वांद्रे गर्दीप्रकरणी पत्रकाराविरुद्ध FIR

    काल वांद्रे रेल्वेस्टेशनबाहेरजमललेल्या गर्दीप्रकरणी ‘एबीपी माझा’चे पत्रकार राहुल कुलकर्णी यांच्यावर FIR नोंदवण्यात आला असून त्यांना उस्मानाबाद पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

    स्थलांतरितांसाठी गाड्या सुरू होणार,या त्यांनी दिलेल्याबातमीमुळे काल वांद्रे स्थानकाबाहेर लोक गोळा झाले,असा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 188, 269,270, 117 या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

    या प्रकरणी आम्ही एबीपी माझाची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता,त्याला प्रतिसाद आला नाही.

  19. रुपयाने गाठला ऐतिहासिक नीचांक

    कोरोना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय व्यापार ठप्प असल्यामुळे रुपयाने आज ऐतिहासिक नीचांक गाठला. एरवी एका डॉलरची किंमत 70-72 रुपयांवर गेल्याने लोकांच्या भूवया उंचावतात, मात्र आज रुपयाने 76.5चा न भूतो असा आकडा गाठला.

  20. जर्मनीत कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या तीन हजारपेक्षा जास्त

    जर्मनीत कोरोना व्हायरसमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 3254 झाली आहे.

    रॉबर्ट कोच इन्स्टिट्यूट फॉर इन्फेक्शिअर डिसीजनं दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या चोवीस तासात जर्मनीत 285 लोकांचा मृत्यू झाला आहे.

    जर्मनीमध्ये एकूण 1 लाख 27 हजार 584 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. अर्थात, यातील अनेक जण बरेही झाले आहेत.