कोरोना व्हायरस: उद्धव ठाकरे यांनी मांडलेले 11 महत्त्वाचे मुद्दे

फोटो स्रोत, CMO Maharashtra
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी अक्षय तृतीया, तसंच रमजानच्या शुभेच्छा दिल्या.
तसंच, लॉकडाऊनमुळे कोरोनाचा वेग संथ ठेवण्यात आपण यशस्वी झालो आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
विशेष म्हणजे, यावेळी उद्धव ठाकरेंनी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांचे आभारही मानले.
ते म्हणाले, "नितीन गडकरींना मला धन्यवाद द्यायचे आहेत. केंद्रात, राज्यात एकोपा असताना काही लोक राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या परिस्थितीत राजकारण न करता सगळ्यांनी महाराष्ट्र सरकारसोबत मिळून काम करावं, हे गडकरींनी आवाहन केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
उद्धव ठाकरे यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे :
1. रमजानचा महिना सुरू झाला आहे. मुस्लीम बांधवांनी रस्त्यावर नमाज करण्याची ही वेळ नाही. घरीच प्रार्थना करावी.
2. देव आता मंदिरात नाही, आपल्यामध्ये आहे. डॉक्टर, पोलीस यांच्या रुपात देव आला आहे. त्यांचा आदर करणं गरजेचं आहे.
3. आपल्या दोन पोलीस कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांना मी सगळ्यांच्या वतीनं आदरांजली वाहतो.
4. लॉकडाऊनमुळे कोरोनाचा वेग संथ ठेवण्यात आपण यशस्वी झालो आहोत.
5. लॉकडाऊन संपवण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स नेमण्यात आला आहे. सरकार चहूबाजूंनी काम करत आहे.
6. नितीन गडकरींना मला धन्यवाद द्यायचे आहेत. केंद्रात, राज्यात एकोपा असताना काही लोक राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या परिस्थितीत राजकारण न करता सगळ्यांनी महाराष्ट्र सरकारसोबत मिळून काम करावं, हे गडकरींनी आवाहन केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.

- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?

7. मजुरांना लवकर गावी पाठवण्याची सोय करू. पण, अद्याप ट्रेन सुरू करण्यात येणार नाही.
8. कोटामध्ये राज्यातील विद्यार्थी आहेत, त्यांना तिथून वापस आणणार आहोत.
9. ग्रामीण भागात जिल्ह्याच्या वेशी बंदच राहणार आहेत. जिल्हा अंतर्गत वाहतूक मात्र सुरू राहील.
10. राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या 1 लाख 8 हजार 972 चाचण्या केल्या आहेत. 1 लाख 1 हजार 162 जणांचे नमुने निगेटिव्ह आलेत. जवळपास 7 हजार 628 नमुने पॉझिटिव्ह आले आणि 323 रुग्णांचा मृत्यू झालाय.
11. कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहे. कृषी माल वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)




















