शाळेसाठी बोटीतून जीवघेणा प्रवास करणारे विद्यार्थी
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात 100 वर्षांपूर्वीचं तानसा धरण आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वसलेले अनेक आदिवासी पाडे आजही मुख्य प्रवाहापासून तुटलेले आहेत.
बोरालेपाडातले विद्यार्थी बोटीतून जीवघेणा प्रवास करत सावरदेवच्या शाळेत पोहचतात. पहिली ते आठवीपर्यंत प्राथमिक शिक्षण हा प्रत्येक बालकाचा अधिकार आहे असं शिक्षण हक्क कायदा सांगतो. परंतु प्रत्यक्षात असे अनेक आदिवासी विद्यार्थी आजही शिक्षणासाठी झगडतायत.
रिपोर्ट- दीपाली जगताप
शूट आणि एडिट- शरद बढे
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)