विदर्भात पुरामुळे लोकांना घर सोडायची पाळी का येतेय?

Published

अतिवृष्टीमुळे वर्धा, अमरावती, यवतमाळ आणि गडचिरोली या विदर्भातील जिल्ह्यांना तडाखा बसला आहे. पुराच्या पाण्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येतंय. वर्ध्यामध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळल्याने अनेक गावांशी संपर्क तुटल्याचं प्रशासनाने सांगितलंय.

निम्न वर्धा प्रकल्पाचे 31 दरवाजे उघडल्याने नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. वर्धाच्या 42 तर अमरावतीच्या 20 गावांचा संपर्क तुटल्याचं प्रशासनाने म्हटलंय. मेळघाट प्रशासनानेही सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)