मेळघाट : विहिरीवर पाण्यासाठी तडफणारं गाव आणि हतबल महिला
Published
अमरावतीपासून जवळपास 135 किलोमीटर अंतरावर अतिदुर्गम खडीमल गाव सोयी-सुविधांपासून वंचित तर आहेच, सोबतच पाण्यावाचून तहानलेलंही आहे. खडीमल गावाची लोकसंख्या 1500च्या घरात आहे. त्यात दिवसातून दोन किंवा तीन वेळा टँकर येतात. हंडाभर पाणी मिळवण्यासाठी विहिरीजवळ महिलांचा आटापिटा सुरू होतो.