आर्थिक प्रगती होत असतानाही बेरोजगारीचा दर इतका जास्त का? सोपी गोष्ट 510
कोव्हिड 19मुळे झालेला लॉकडाऊन, कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट यातून सावरत असलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये नोकऱ्यांचं प्रमाण अजूनही पूर्वीइतकं नाही.
ओमिक्रॉनच्या संसर्गामुळे पुन्हा एकदा रोजगारांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय.
भारतातलं नोकऱ्यांचं संकट हे वाटतं त्यापेक्षा अधिक गहन असल्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. भारतातल्या बेरोजगारीचा दर डिसेंबर 2021मध्ये 8% पर्यंत गेला होता. देशातला रोजगार आणि पगारी नोकऱ्यांची संख्या कमी झालेली आहे.
काय आहे यामागचं कारण? समजून घेऊयात या सोपी गोष्टमध्ये.
वार्तांकन: सौतिक बिस्वास आणि टीम बीबीसी
लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे
व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)