लग्न रद्द करावं लागल्यामुळे दोन्हीकडच्या कुटुंबांना धक्का बसला आणि मानसिक त्रास झाला.
रसिका आणि आसिफ अतिशय आनंदात होते. 8 वर्षांच्या मैत्रीनंतर त्यांनी लग्न करायचं ठरवलं होतं. मोठ्या प्रयत्नांनी घरच्यांची संमती मिळवली होती, तारीख ठरली, पत्रिका वाटल्या गेल्या पण ऐनवेळी या लग्नात लव्ह जिहादच्या नावाखाली विघ्न आणलं गेलं.
लग्न रद्द करावं लागल्यामुळे दोन्हीकडच्या कुटुंबांना धक्का बसला आणि मानसिक त्रास झाला.
दोघांचं कोर्ट मॅरेज झालंय पण तरी या दांपत्याची इच्छा आहे कीआपलं वैवाहिक जीवन सुरू होण्याआधी दोन्ही धर्मांच्या पद्धतीने लग्न व्हावं. लग्नाचा निर्णय भावनेच्या भरात किंवा एका दिवसात घेतला नाही असंही आसिफ सांगतात.
रिपोर्ट - अनघा पाठक
शूट - मंगेश सोनावणे
एडिट - अरविंद पारेकर
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)