प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरील विधानावरुन का केलं घुमजाव?

व्हीडिओ कॅप्शन, प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरील विधानावरुन का केलं घुमजाव?
Published

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी स्वतःच्या पक्षाबद्दल आणि महाविकास आघाडीबद्दल नाराजी व्यक्त केली.

अडचणीच्या काळात पक्षप्रमुख पाठिशी उभे राहिले नाहीत, असं शिवसेना आमदार प्रताप सरनाईक म्हणाले आहेत. ईडीच्या चौकशीचा ससेमिरा सुरू असताना शिवसेना पक्ष, पक्षप्रमुख आणि महाविकास आघाडी सरकार पाठीशी उभं राहिलं नसल्याचं आमदार प्रताप सरनाईक यांनी सभागृहात म्हटलं. आता मात्र त्यांनी आपल्या वक्तव्यावरून घूमजाव केला आहे.

काही दिवसांपूर्वी सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्राची बरीच चर्चा झाली होती. ते पत्र लिहिण्याचं कारण सांगताना सरनाईक यांनी ही नाराजी मांडली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)