भारत-पाक शांतता - पाकिस्तानला का करायची आहे भारताशी मैत्री? । सोपी गोष्ट 299

व्हीडिओ कॅप्शन, भारत-पाक शांतता - पाकिस्तानला का करायची आहे भारताशी मैत्री? । सोपी गोष्ट 299
Published

भारत पाकिस्तान दरम्यान सीमेवर होणाऱ्या चकमकी अलीकडे कमी झाल्यात असं वाटतं का? कारण न्यूजपेपर आणि वेबसाईटवर तशा बातम्या तरी कमी झाल्यात. अधिकृत बातमी असं सांगते की, मागच्या तीन आठवड्यात सीमेपलीकडून असा कुठलाही मोठा गोळीबार झालेला नाही.

उलट, भारत आणि पाकिस्तानने 2003च्या युद्धविराम कराराचं पुन्हा पालन करायचं ठरवलं आहे अशी बातमी तुम्हाला बघायला मिळेल. आणि भर म्हणून मंगळवारी दोन देशांमधला सिंधू नदी पाणी वाटपाच्या प्रश्नावरही दोन्ही देशांदरम्यान चर्चा होणार आहे. यावेळी शांततेचा आणि युद्धविरामाचा प्रस्ताव पाकिस्तानकडून आलाय. आश्चर्य वाटलं ना तुम्हाला?

तेव्हा आज सोपी गोष्टमध्ये बोलूया पाकिस्तानला भारताशी पुन्हा शांतता का प्रस्थापित करायचीय. आणि भारताचा त्याला प्रतिसाद कसा आहे, सोपी गोष्टमध्ये….

संशोधन - बीबीसी उर्दू टीम, ऋजुता लुकतुके

लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके

एडिटिंग- शरद बढे

हेही पाहिलंय का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)