मुंबईकर चाकरमानी आणि गाववाले यांच्या संघर्षातून रस्ता काढणारी सरपंच

Published

लॉकडाऊनमध्ये आणि नंतरही कोकणातल्या अनेक गावांनी आपल्या सीमा शहरातल्यांसाठी. विशेषतः मुंबईकरांसाठी बंद केल्या. गावात राहाणारेही आपलेच आणि मुंबईतून येणारेही आपलेच अशा कात्रीत अनेक गावांचे सरपंच अडकले.

कोळोशी गावच्या रितीका सावंतही त्यातल्यात. पण याही परिस्थितीत त्यांनी मार्ग काढला. कोरोनाच्या संकटांत महिलांचे नेतृत्वगुण प्रकर्षांने पुढे आले असं त्यांना मनापासून वाटतं. आंतरराष्ट्रीय पातळीवर महिला नेत्यांनी कोरोनाला सक्षमपणे हाताळल्याचं चित्र आपण 2020 मध्ये पाहिलं.

पण स्थानिक पातळीवर गावखेड्यातल्या महिला नेत्याही कुठे कमी पडल्या नाहीत. म्हणूनच बीबीसी घेऊन आलंय कोरोनाशी लढा देणाऱ्या काही महिला सरपंचांच्या प्रेरणादायी कहाण्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)