ताडोबामधील वाघांच्या नसबंदीचा प्रस्ताव वनविभागाने का आणि कशासाठी मांडला?
ताडोबा हे वाघांच्या अधिवासाचं 1700 वर्गकिलोमीटरचे संरक्षित जंगल आहे. ताडोबा -अंधारीसोबतच घोडाझरी, कनरगाव ही चंद्रपूर जिल्ह्यातली संरक्षित जंगलंही शेकडो वाघांसह इतर वन्यजीवांसाठी नंदनवन आहेत.
वाघांचं नंदनवन असलेला चंद्रपूर जिल्हा सध्या एका वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आला आहे. वाघांची संख्या वाढल्याने मानवी वस्तीवर हल्लेही वाढले आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघांच्या नसबंदीचा प्रस्ताव पुढे आला, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तो फेटाळला. हा प्रस्ताव मुळात पुढे का आला आणि वाघांची संख्या चंद्रपूरमध्ये का वाढली या प्रश्नांची उत्तर शोधणारा हा रिपोर्ट.
रिपोर्ट- प्रवीण मुधोळकर
व्हिडिओ एडिटींग- शरद बढे
प्रोड्युसर- प्राजक्ता धुळप
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)