You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना संकटात पोटदुखीकडे दुर्लक्ष करू नका, असं डॉक्टर का सांगत आहेत?
पावसाळ्यात अन्नातून विषबाधा झाल्याने डायरिया होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे डायरिया झाला म्हणजे कोरोनाची लागण झाली असे नाही. पण आपण कोरोनासारख्या आरोग्य संकटातून जात असल्याने प्रत्येकाने काही गोष्टी ध्यानात घेणे गरजेचे आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, डायरियासोबत इतर कोणतीही लक्षणं नसतील तरी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच औषधं घ्या.
डायरिया होण्यापूर्वी आपल्याला अंगदुखी, ताप किंवा घसादुखी असं काही झालं होतं का? याचा विचार करुन अशा परिस्थितीमध्ये तातडीने आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा. त्यांना डायरिया होण्यापूर्वी काय झाले होते तेही सांगा.
आपण कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलो का ? त्यानंतर डायरिया झालाय का? असाही विचार संबंधित व्यक्तीने करायला हवा.
ज्येष्ठ नागरिक, डायबेटीस आणि इतर गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना डायरिया झाला तरीही त्यांनी कोरोनाची टेस्ट करायला हवी असा सल्ला डॉक्टर देतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)