You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्र आणि भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना लॉकडाऊन उठवावा का? #सोपीगोष्ट 87
24 मार्च रोजी देशात कोव्हिड-19 च्या रुग्णांची संख्या 564 होती आणि राज्यातल्या रुग्णांची संख्या 101 होती. 2 महिन्यांच्या लॉकडाऊननंतर भारतातल्या रुग्णांची संख्या 1 लाख 51 हजार आहे.
त्यापैकी एक तृतियांश रुग्ण हे महाराष्ट्राचे आहेत. म्हणजेच महाराष्ट्रातल्या रुग्णांची संख्या 54,758 इतकी आहे. तेव्हा लॉकडाऊनचा उद्देश सफल झाला नाही का? असा प्रश्न आपल्या मनात येऊ शकतो.
संख्या वाढत असताना लॉकडाऊन उठवला जाणार आहे, असं दिसत आहे तेव्हा सरकारची पुढची योजना नेमकी काय आहे असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विचारला आहे.
लॉकडाऊन ज्या उद्दिष्टासाठी लावण्यात आला होता, ते उद्दिष्ट आपण गाठलं आहे का? असा सवाल आता सर्व स्तरातून येत आहे. आजच्या सोपी गोष्टमध्ये आपण हेच पाहणार आहोत की भारतात लॉकडाऊन यशस्वी झाला की नाही?
संशोधन - तुषार कुलकर्णी
सादरीकरण - विनायक गायकवाड
- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
एडिटिंग - तुषार कुलकर्णी