You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
केरळ, भिलवाडा, आग्रा पॅटर्नमधून महाराष्ट्रानं काय शिकायचं? सोपी गोष्ट
देशातली सर्वांत पहिली कोरोनाची केस केरळमध्ये सापडली. देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता 10 हजाराहून अधिक झाली आहे. पण केरळमध्ये कोरोनाची पॉझिटिव्ह असलेल्यांची संख्या 400हून अधिक नाही.
सर्वांत आधी कोरोनाचे पेशंट सापडलेल्या केरळमध्ये स्थिती नियंत्रणात कशी आली हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
यालाच केरळ मॉडेल असं म्हटलं जात आहे. पण त्याच बरोबर देशात आणखी दोन मॉडेल्सची चर्चा आहे. भिलवाडा आणि आग्रा. यांना भिलवाडा पॅटर्न किंवा आग्रा पॅटर्नही म्हटलं जात आहे.
केरळ, भिलवाडा आणि आग्रा या ठिकाणी कोरोना आटोक्यात कसा आला. हाच पॅटर्न आपल्याला देशभरात आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्रात राबवता येणार नाही का? असा ही प्रश्न चर्चिला जात आहे.
हे पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)