पंजाबमधली ही तरुण शेतकरी प्रदूषणमुक्तीसाठी करतेय असे प्रयत्न - पाहा व्हीडिओ
Published
अमनप्रीत कौर पंजाबमधील सांगरूर जिल्ह्यातल्या कनोई गावात राहते.
गेल्या 3 वर्षांपासून ती शेतात वडिलांसोबत काम करत आहे. पिकांची कापणी झाल्यानंतर जाळण्यात येणारा पेंढा हे प्रदूषणामागचं मोठं कारण आहे, असं त्यांच्या लक्षात आलं.
“मला लहानपणापासून दम्याचा काहीसा त्रास होता, पेंढा जाळल्यानंतर मी कासावीस व्हायचे. एक दिवस मी वडिलांना पेंढा जाळू नका,” असं सांगितलं.
त्यानंतर गावातल्या ज्येष्ठांचाही पाठिंबा मिळाल्याचं ती सांगते.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)