काश्मीर: कलम 370 विरोधातल्या याचिकेला काही अर्थ नाही - सर्वोच्च न्यायालय

फोटो स्रोत, Ani
सरकारच्या कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी याचिकाकर्त्याला फटकारलं आहे.
सरन्यायाधीश गोगोई यांच्याबरोबर न्यायाधीश एस. बोबडे आणि एस. ए. नजीर यांच्या खंडपीठाने कलम 370 विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी केली.
वकील एम. एल. शर्मा यांनी सरकारच्या कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेला काही एक अर्थ नाही, असं या खंडपीठानं म्हटलं.
"ही कसली याचिका आहे? ही याचिका नामंजूर केली जाऊ शकते, परंतु रजिस्ट्रीकडे आणखी 5 याचिका आहेत," असं खंडपीठानं म्हटलंय.

फोटो स्रोत, Twitter
"मी कलम 370 वरील याचिका वाचण्यासाठी 30 मिनिटं घालवली, पण त्यातून काही निष्पन्न झालं नाही," असं खंडपीठानं म्हटलंय.
"तुमचं म्हणणं तरी काय आहे? राष्ट्रपतींचा आदेश स्वीकारला जाऊ नये असं देखील तुम्ही म्हटलं नाही. मग तुमचं म्हणणं तरी काय आहे?" या शब्दांत सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्यांना फटकारलं.
सर्वोच्च न्यायालयानं वकिलांना कलम 370 वरील सहा याचिकांमधील तांत्रिक दोष दूर करण्यास सांगितलं आणि सुनावणी तहकूब केली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























