आसाम, बिहारमध्ये पूरामुळे शेकडो लोक बेपत्ता
Published
बिहार राज्यात पाऊस सध्या थांबला असला तरी पूरस्थिती कायम आहे. इतके दिवस झालेल्या पावसामुळे नद्यांची पाणी पातळी वाढली आहे.
आणि या पाण्याच्या लोंढ्यात लहान लहान बंधारे फुटून गावंच्या गावं पाण्याखाली वाहून जातायत.
साठहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोक बेपत्ता आहेत. मात्र मदतकार्य अपुरं ठरतंय.
आणि त्यामुळे अनेकांना अक्षरश: रस्त्यावर किंवा मिळेल तिथे आसरा घ्यावा लागतोय.
बीबीसीचे नीरज प्रियदर्शी आणि देवाशिष कुमार यांचा ग्राऊंड रिपोर्ट...
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)