महाराष्ट्र किसान लाँग मार्च : शेतकरी नाशिकहून मुंबईला पुन्हा चालत का निघाले आहेत?

व्हीडिओ कॅप्शन, महाराष्ट्र किसान लाँग मार्च : शेतकरी नाशिकहून मुंबईला पुन्हा चालत का निघाले आहेत?
महाराष्ट्र किसान लाँग मार्च : शेतकरी नाशिकहून मुंबईला पुन्हा चालत का निघाले आहेत?
Published

अखिल भारतीय किसान सभेचा लॉंग मार्च माजी आमदार जीवा पांडू गावित यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा मुंबईत धडकणार आहे. हा मार्च नाशिकमध्ये थांबवण्याचे सरकारचे प्रश्न अयशस्वी ठरल्याचं म्हटलं जातंय. पालकमंत्री दादा भुसे आणि किसान सभेचं शिष्टमंडळ यांच्यात तब्बल 4 तास झालेली बैठक लॉंग मार्चला थांबवू शकली नाही. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सोमवारी सकाळी नाशिक ते मुंबई अशा शेतकऱ्यांच्या पायी लाँग मार्चला सुरुवात झाली. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना हे शेतकरी पायी जवळपास 180 किलोमीटरचा प्रवास करत आहेत.

शेतकरी आंदोलन, मुंबई, नाशिक
फोटो कॅप्शन, शेतकरी आंदोलन