गोरक्षणाच्या नावाखाली शेतकऱ्यांना कसा त्रास दिला जातोय?
गोरक्षणाच्या नावाखाली शेतकऱ्यांना कसा त्रास दिला जातोय?
Published
महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायद्याला 10 वर्षं पूर्ण झाली आहेत. गोवंश हत्याबंदी आणि त्यावरून गोरक्षखणाच्या नावाखाली होणाऱ्या अडवणुकीवरून आता हा मुद्दा चर्चेत आलाय.
शेतकऱ्यांचा विरोध इतक्या दिवस ठळकपणे दिसत नव्हता, मात्र आता ठिकठिकाणी शेतकऱ्यांकडून आंदोलन सुरू झाल्यानंतर हा प्रश्न ऐरणीवर आलाय.
राज्यातील कुरेशी व्यावसायिकांनी संप पुकारल्यानंतर शेतकरीही मैदानात उतरलेत. आता गोवंश हत्याबंदी तसेच गोरक्षकांकडून होणाऱ्या अडवणुकीवर शेतकरी बोलू लागले आहेत. काय आहे या शेतकऱ्यांचं म्हणणं?
रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे
शूट – किरण साकळे
शूट सहाय्य – प्रवीण सिंधू
एडिट – अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






