अर्थव्यवस्था श्रीमंत होऊनही तुम्ही गरीबच राहू शकता का?

पंतप्रधानांनी दावा केलाय - जगातल्या पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये भारत असेल. ही आकडेवारी कशी ठरते? तर जीडीपीच्या वाढीच्या दरावर.
गेल्या 9 वर्षांत भारताचा जीडीपी 83 टक्क्याने वाढला असला तरी तुमच्यातले काही लोक म्हणतील की आमचा पगार आणि खर्च याची सांगड पूर्वी होती तशीच आहे किंवा त्यापेक्षा वाईट आहे. आमची आर्थिक स्थिती सुधारलेली नाही. हे कसं?
देशाची अर्थव्यवस्था वाढणं ही चांगलीच गोष्ट आहे, पण त्या वाढलेल्या उत्पन्नाचं वाटप आणि वितरण कसं आहे? जीडीपीच्या बाबतीत भारत आज जगात पाचव्या क्रमांकावर आहे,पण दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत भारताचं स्थान जगातील पहिल्या 100 देशांमध्ये नाही. असं का?
लेखन - अनंत प्रकाश
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग – अरविंद पारेकर
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



