'समज-गैरसमज' कार्यक्रमात धर्मनिरपेक्षता विषयावर डॉ. सुहास पळशीकर यांच्या नव्या पिढीसोबत दिलखुलास गप्पा
धर्मनिरपेक्षता अर्थात सेक्युलॅरिझम या संकल्पनेभोवती अनेक समज आणि गैरसमज आहेत.
भारताच्या बहुविध आणि सर्वसमावेशक ओळखीचा उल्लेख करताना धर्मनिरपेक्षता हा शब्द वारंवार वापरला जातो. पण या संकल्पनेचा उगम काय आहे? आजच्या भारतात तिचं स्थान काय आहे? आणि लोकशाहीच्या भवितव्याशी तिचा नेमका संबंध कसा जोडला जातो?
या प्रश्नांवर डॉ. सुहास पळशीकर यांनी तरुणांसोबत अतिशय सोप्या आणि संवादात्मक पद्धतीने चर्चा केली आहे. दैनंदिन आयुष्यात धर्मनिरपेक्षतेबद्दल पडणारे प्रश्न, संभ्रम आणि अनुभव तरुणांनी मोकळेपणाने मांडले असून त्यांची सविस्तर उत्तरं या संवादातून मिळतात.
Credits:
लोकेशन- द बॉक्स, पुणे
लाइटिंग- मैत्रेय राणे
फिल्ड आणि रिसर्च- प्राची कुलकर्णी
शूटिंग- नितीन नगरकर, शरद बढे, प्राजक्ता धुळप
एडिटिंग- शरद बढे
प्रोड्यूसर- प्राजक्ता धुळप
संपादक- अभिजीत कांबळे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






